लक्ष वळविण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा

लक्ष वळविण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा

'राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. जनावरांना चारा आणि पाणी नाही. देशातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. मूळ प्रश्‍नांना बगल देऊन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी राम मंदिर आणि अयोध्येचा मुद्दा समोर आणला जात आहे,' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केली. म. टा. प्रतिनिधी, पुणे 'राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. जनावरांना चारा आणि पाणी नाही. देशातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. मूळ प्रश्‍नांना बगल देऊन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी राम मंदिर आणि अयोध्येचा मुद्दा समोर आणला जात आहे. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. स्टच्या वतीने धनकवडी येथे उभारण्यात आलेल्या संविधान स्तंभाचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, खासदार सुप्रिया सुळे, अॅड. वंदना चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, नगरसेवक संयोजक विशाल तांबे, दत्तात्रय धनकवडे, किशोर धनकवडे, अश्विनी भागवत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. संविधान जागृती करण्याचे कार्य केल्याप्रीत्यर्थ प्रा. सुभाष वारे, डॉ. प्रशांत पगारे आणि डॉ. अशोक शिलवंत यांचा सन्मान करण्यात आला. 'संविधानाचा आशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडील लोकशाही व्यवस्था अजूनही टिकून आहे. सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी संविधानाच्या मार्गानेच जावे लागणार आहे,'असेही पवार म्हणाले. संविधान स्तंभाच्या माध्यमातून चांगले संस्कार घडविण्याचा आणि समाजातील ऐक्य टिकविण्याचा प्रयत्न आहे. या स्तंभाच्या धर्तीवर परराज्यातील आणि अन्य पक्षातील खासदारांनीही आपापल्या ठिकाणी स्तंभ उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुळे यांनी दिली. पंपावर गेल्यावर 'राम' आठवतो का? विचारांचा मुडदा पाडण्यात आपल्या देशाइतका पटाईत दुसरा देश नाही. संविधानाचे संस्कार घरात, शाळेत मुलांवर कसे होणार? सुरुवातीपासून आपण सारे एक आहोत, हे सांगणारे संस्कार मुलांवर कसे होणार? आपल्याला फार मोठा बदल करायचा असून, आपण परिवर्तनाचे भुकेले आहोत. मात्र, सध्याची परिस्थिती वेगळी आहे. आपण 'रामा'वर बोलत आहोत. पेट्रोल पंपावर गेल्यावर तुम्हाला राम आठवतो की पेट्रोलचा भाव आठवतो, असा प्रश्नही डॉ. आढाव यांनी उपस्थित केला. पवारांनीच केली प्रोटोकॉलची आठवण कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजकांनी शरद पवार यांचा सत्कार केला. त्यांच्याच्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या सत्काराची घोषणा करण्यात आली. मात्र, व्यासपीठावर डॉ. बाबा आढाव, प्रा. सुभाष वारे यांच्यासारखे लोक आहेत. त्यांचा सत्कार आधी करावा, असे पवार यांनी सुचविले. एवढेच नाही, तर पवार यांनी स्वत:हा डॉ. आढाव यांचा हात धरून उभे करून त्यांना सत्कार स्वीकारण्यासाठी आग्रह धरला. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/ram-temple-issue-to-turn-the-attention-sharad-pawar/articleshow/66816494.cms

Read More
  177 Hits

मूळ प्रश्‍नांना बगल देण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा : शरद पवार

मूळ प्रश्‍नांना बगल देण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा : शरद पवार

पुणे: प्रतिनिधी राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आहे. जनावरांसाठी चारा-पाणी नाही. लोकांच्या हाताला काम नाही. देशातही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही, असे असताना मूळ प्रश्‍नांना बगल देण्यासाठी आणि नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा समोर आणला जात आहे, अशी खरमरीत टीका ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली आहे. देशातील सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी संविधानातील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले संविधान दिनाचे औचित्य साधून पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने धनकवडी येथे साकारलेल्या संविधान स्तंभाचे लोकार्पण आणि संविधान सन्मान अभियानाचा शुभारंभ सोमवारी शरद पवार यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, खासदार सुप्रिया सुळे, खा. अ‍ॅड. वंदना चव्हाण, आमदार अ‍ॅड. जयदेवराव गायकवाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नानासाहेब देवकते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शहराध्यक्ष चेतन तुपे, स्थानिक नगरसेवक व संयोजक विशाल तांबे,  प्रा. सुभाष वारे, डॉ. अशोक शिलवंत, डॉ. प्रशांत पगारे आदींसह राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले, देशातील विविध जाती- धर्मांच्या लोकांना एकसंघ बांधून ठेवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाने केले आहे. खा. सुळे म्हणाल्या,  संविधानासंबंधी जनतेमध्ये जागृकता निर्माण करण्याच्या हेतूने संविधान स्तंभ उभारण्यात आला असून देशातील इतर राज्यातील खासदारही याचे अनुकरण करणार आहेत. प्रा. सुभाष वारे म्हणाले, ज्यांनी संविधान जाळले त्यांना मोकाट सोडून त्याविरोधात आंदोलन करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. पंपावर पेट्रोलचे दर आठवतात की, राम मंदिरशालेय अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा समावेश होणे गरजेचे आहे. आज राज्यकर्त्यांकडून संविधान बदलण्याची भाषा केली जाते. नागरिकांचे मन दुसरीकडे वळवण्याचे प्रयत्न केले जातात, मात्र पेट्रोल पंपावर गेल्यावर पेट्रोलचे दर आठवतात की, राम मंदिर आठवते यावर कोणीच बोलत नाही.  - डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते http://www.pudhari.news/news/Pune/Ram-temple-issue-to-keep-original-questions-says-Sharad-Pawar/

Read More
  144 Hits

Pawar attacks Sena, BJP for raking up Ayodhya issue

Pawar attacks Sena, BJP for raking up Ayodhya issue

Pawar attacks Sena, BJP for raking up Ayodhya issue“Youths are jobless, farmers and citizens are suffering from drought. There is no water for people to drink and THE elected representatives, instead of paying attention to these issues, are going to Ayodhya,” he said indirectly taking a jibe at Shiv Sena Chief Uddhav Thackeray.He was speaking at an event organised by Pawar Public Charitable Trust (PPCT) of dedicating the ‘Constitution Pillar’ on the occasion of ‘Constitution Day’, which was celebrated on Monday. Baramati MP Supriya Sule was also present.“Today, many districts in the state are reeling under drought and there is no water for people to drink. People are jobless and worried. Now, in such a situation, elected representatives should stand by the people, but in spite of that, the Ayodhya issue was dug up. I don’t want to get into Ayodhya issue or Ram Janambhoomi issue. But if the country is being taken into a different direction from the main issue, then I think something wrong is happening,” he said.On the eve of Diwali, Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath had announced that he will build a 151-metre-long statue of Lord Ram in Ayodhya.Taking it up, Pawar said, “A chief minister of a state says that he will build a bigger statue. He can do that, I have no doubts about it. But today, in this situation, whether to build a tall statue or help the drought-affected people is the question. An attempt is being done to divert all from the main issues and from genuine issues.”“Today, some people in country talk about changing the constitution. Recently, a minister from Central government openly said that ‘in Karnataka, they had come to change the Constitution and to correct it’. You (people) have been given strong rights by the constitution and that they want to take it away.Hence, they make such statements but this country will never accept it. If someone tries to attack the Constitution, then this country does not accept it and we have seen this in the past as well,” the NCP chief said.http://www.sakaltimes.com/pune/pawar-attacks-sena-bjp-raking-ayodhya-issue-28267

Read More
  191 Hits

धनंजय... लोकसभेचा विचार करताय काय ? - सुप्रिया सुळे

राजेभाऊ मोगल03.28 PMऔरंगाबाद - धनंजय... तुमचे हिंदीतले अतिशय सुंदर भाषण आज प्रथमच ऐकले, लोकसभेचा विचार करताय का काय ? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर मंगळवारी (ता.09) चांगलीच गुगली टाकली. मुंडे यांनीही या गुगलीने गोंधळून न जाता स्माईल दिली. औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित संविधान बचाव परिषदेत बोलतांना विधान परिषद विरोधी पक्षनेते यांच्या भाषणात हिंदीतील काही वाक्य आणि काही हिंदी शेरचा उल्लेख होता. त्यांच्या नंतर भाषणाला उठलेल्या सुप्रिया सुळे यांनी सुरुवातीलाच धनंजय मुंडे यांच्याकडे पाहत आज तुमचे हिंदीतील भाषण प्रथमच ऐकले, खूप छान हिंदी बोलता, कोणी हिंदी बोलू लागले की तो लोकसभेचा विचार करतो आहे का काय ? असा विचार आमच्या मनात येतो, तुमच्या मनात ही तसा काही विचार नाही ना ? अशी गुगली टाकली. या गुगलीने संपूर्ण सभागृहाचे लक्ष मुंडे काय प्रतिक्रिया देतात याकडे गेले, मात्र त्यांनी या गुगलीवर फक्त एक स्माईल देत या गुगलीला सन्मानजनक उत्तर दिले.तत्पूर्वी, बोलतांना मुंडे यांनी मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर 2022 साली संपूर्ण संविधान बदलून टाकतील अशी भीती व्यक्त केली. http://www.esakal.com/marathwada/dhananjay-mundhe-are-you-think-about-lok-sabha-says-supriya-sule-148657

Read More
  0 Hits

मुख्यमंत्र्यांचा `पायगुण' जळगावकरांना अंधार देणारा ठरला : सुप्रिया सुळे

योगेश महाजन, बुधवार, 10 ऑक्टोबर 2018अमळनेर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावला आले, वीज बंद करून गेले अन् जळगावकरांच्या वाट्याला भारनियमन देवून गेले. आपण अधंश्रध्दा मानत नाही, परंतु मराठीतून एखाद्याच्या येण्यावर आणि त्याच वेळी काही घडण्यावर `पायगुण' असा शब्द वापरला जातो. जळगावकरांसाठी मुख्यंमत्र्यांचा हा `पायगुण' अंधार देणारा ठरला, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी केली आहे. अमळनेर येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, की सरकारच्या कोळशाच्या चुकीच्या धोरणामुळे विजेचे भारनियमन होत आहे. हे सरकार बेजबाबदार आहे. कुठल्याही गोष्टीचे नियोजन नाही. भाजप सरकारने 24 तास वीजपुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, 24 तास वीज मिळते काय ? जळगावमध्ये सकाळी सात ते दहा व सायंकाळी सात ते दहा असे रोज सहा तास भारनियमन होत आहे. या सरकारचे नियोजन नसून, जनता वेठीस धरली जात आहे. शेतकरी बांधव दुष्काळात होरपळले आहेत. मात्र, तरीही शासनाला जाग येत नाही, अशीही टीका खासदार सुळे यांनी यावेळी केली. राम कदमांबद्दल मुख्यमंत्र्यांची चुप्पी दहीहंडी कार्यक्रमात भाजपचे आमदार राम कदम हे महाराष्ट्रातील मुलींबद्दल असभ्य भाषेचा वापर करतात हे भारतीय संस्कृतीसाठी लांच्छनास्पद आहे. मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असल्याने त्यांनी आमदार कदम यांना चाप द्यायला हवा होता. गृहमंत्री म्हणून त्यांच्यावर काही तरी कारवाई होणे अपेक्षित होते. हेच जर "राष्ट्रवादी'च्या एखाद्या आमदाराने केले असते तर त्याला जनतेसमोर नेऊन जाहीर माफी मागायला लावले असते. लोकप्रतिनिधींनी असे बोलणे योग्य नाही आणि यावर गृहमंत्र्यांनी साधलेली चुप्पी याचा आपण निषेध करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. http://www.sarkarnama.in/amalner-supriya-sule-devendra-fadanvis-29575

Read More
  0 Hits

जैन समाजाचे सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय : खा. सुप्रिया सुळे

प्रशांत चवरेबुधवार, 17 ऑक्टोबर 2018भिगवण : जैन समाजाच्या वतीने समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार पुढाकार घेतला जातो ही आनंदाची बाब आहे. पाणी टंचाई दुर, शैक्षणिक प्रश्न सोडविण्यामध्ये भारतीय जैन संघटनांसारख्या संघटना महत्वपुर्ण भुमिका बजावत आहेत. जैन समाजाचे सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान निश्चित उल्लेखनीय आहे असे मत बारामती लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे येथील जैन स्थानकांमध्ये सुरु असलेल्या चातुर्मास कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, डि.एन. जगताप, शंकरराव गायकवाड, जयदीप जाधव, धनाजी थोरात, जैन संघाचे संघपती अशोक रायसोनी, अध्यक्ष अभय रायसोनी, रवींद्र रायसोनी, विजय बोगावत,संजय रायसोनी उपस्थित होते. यावेळी बोलताना साध्वी सन्मितीजी म्हणाल्या, राजकारण व समाजकारण यांचा उत्तम मिलाफ पवार कुटुंबामध्ये पहावयास मिळतो. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातुन राबविण्यात येत असलेले मुलींसाठी सायकल वाटप, सर्वसामान्यांच्या आरोग्यांसाठी शिबीर असे उपक्रम कौतुकास्पद आहेत. प्रास्ताविक सचिन बोगावत यांनी केले सुत्रसंचालन राहुल गुंदेचा यांनी केले तर आभार संजय रायसोनी यांनी मानले.https://www.esakal.com/pune/contribution-jain-community-very-important-said-supriya-sule-150224

Read More
  1 Hits

महाराष्ट्राचा 'लाडका' मुख्यमंत्री एकही शब्द कां काढत नाही?

सरकारनामा ब्युरोशनिवार, 15 सप्टेंबर 2018 मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रीपद आहे. त्यांचा एक आमदार मुलींचे अपहरण करुन उचलून नेण्याची भाषा करतात त्यावेळी महाराष्ट्राच्या लाडक्‍या मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही काढला नाही. हे या सरकारचं अपयश आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.  सुळे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षणाबाबत, सुरक्षिततेबाबत बोलत असतात मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत. त्याबाबत मोदी मौन बाळगून का आहेत? हरियाणातील सुशिक्षित घरातील मुलगी शिक्षणासाठी आली होती. तिच्यावर आज सामुहिक बलात्कार होतो त्याचा आपण सगळयांनी जाहीर निषेध केला पाहिजे. महाराष्ट्रामध्येही सातत्याने मुलींची होणारी छेडछाड, बलात्कार अशा गोष्टी घडत आहेत. मुंबईमध्ये अपहरण होवून बेपत्ता होणाऱ्या मुलींची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारच्या क्राईम रिपोर्टमध्ये अडीच ते तीन हजार मुली बेपत्ता असल्याची आकडेवारी देण्यात आलेली आहे. याचं उत्तर कोण देणार, असा सवालही त्यांनी केला आहे. http://www.sarkarnama.in/supriya-sule-questions-devendra-fadavnis-28676

Read More
  0 Hits

सुप्रिया सुळेंचा खड्ड्याबरोबर सेल्फी, मुख्यमंत्र्यांना विचारला जाब

मिलिंद संगई10.39 AMबारामती शहर -  रस्त्यांवरील खडड्यांसोबत सेल्फी काढून सरकारला वारंवार जाणीव करुन दिली, तरी खड्डे बुजविले जात नाहीत. या खड्डयांमुळे जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी राज्य शासनावर असेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधत चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच खड्डयाबाबत जाब विचारला आहे. बोपदेव घाटातील खड्ड्यांचे फोटो फेसबुकवर टाकत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करुन हा इशारा दिला आहे. सेल्फी विथ खड्डा या मोहिमेअंतर्गत वर्षभरापूर्वी सरकारला रस्त्यावरील खड्डयांची जाणीव करुन दिली होती. त्या नंतर माध्यमांच्या साक्षीने पुन्हा महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा खड्डे दाखवून दिले होते. पण जे जनतेला दिसते ते तुम्हाला दिसत नाही का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करीत विचारला आहे.बोपदेव घाटातील खड्डे आपल्या यंत्रणांना दिसत नाहीत काय, असे विचारत या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातेय का, असाही प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला आहे. अक्षरशः चाळण झालेल्या या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्याचा बळी जाऊ शकतो, येथे भविष्यात अपघात होऊन कोणी दगावले तर त्याची जबाबदारी आपल्यावर असेल असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना या द्वारे दिला आहे.http://www.esakal.com/pune/supriya-sules-selfie-pothole-cm-will-be-answerable-144500 

Read More
  2 Hits

खड्यात जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी सरकारची, सुप्रिया सुळेंचा इशारा

सरकारनामा ब्युरोमंगळवार, 18 सप्टेंबर 2018 बारामती : रस्त्यांवरील खडड्यांसोबत सेल्फी काढून सरकारला वारंवार जाणीव करुन देऊनही खड्डे बुजविले जात नाहीत, या खड्डयांमुळे जर कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी राज्य शासनावर असेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.  थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधत चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच खड्डयाबाबत जाब विचारला आहे. बोपदेव घाटातील खड्ड्यांचे फोटो फेसबुकवर टाकत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टॅग करुन हा इशारा दिला आहे. सेल्फी विथ खड्डा या मोहिमेअंतर्गत वर्षभरापूर्वी सरकारला रस्त्यावरील खड्डयांची जाणीव करुन दिली होती. त्या नंतर माध्यमांच्या साक्षीने पुन्हा महिन्याभरापूर्वी पुन्हा एकदा खड्डे दाखवून दिले होते. पण जे जनतेला दिसते ते तुम्हाला दिसत नाही का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करीत विचारला आहे. बोपदेव घाटातील खड्डे आपल्या यंत्रणांना दिसत नाहीत काय, असे विचारत या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जातेय का, असाही प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला आहे. अक्षरशः चाळण झालेल्या या रस्त्यावर अपघात होऊन एखाद्याचा बळी जाऊ शकतो, येथे भविष्यात अपघात होऊन कोणी दगावले तर त्याची जबाबदारी आपल्यावर असेल असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना या द्वारे दिला आहे. http://www.sarkarnama.in/supriya-sule-target-cm-fadanvice-pitch-28780

Read More
  2 Hits

एनडीए प्रशासनाविरोधात कोंढवे-धावडे ग्रामस्थांचे सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू

एनडीए प्रशासनाविरोधात कोंढवे-धावडे ग्रामस्थांचे सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू

*एमपीसी न्यूज - [caption id="attachment_1101" align="alignnone" width="300"] एनडीए_आंदोलन शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे व अहिरेगाव या गावातील ग्रामस्थांना एनडीए प्रशासनाकडून एनडीए हद्दीतून प्रवास करताना व दैनंदिन कामे करताना एनडीए प्रशासनाकडून अडवणूक केली जाते. त्याविरोधात सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली एनडीए प्रशासनाविरोधात आंदोलन केले आहे. मागील दोन तासांपासून कोंढवे-धावडे येथील एनडीए गेट बाहेर हे आंदोलन सुरू आहे. * 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी धनगरबाबा यांच्या उत्सवासाठी आलेल्या भाविकांवर एनडीए प्रशासनाकडून लाठीहल्ला करण्यात आला आणि या भाविकांना बाहेर हाकलण्यात आले. या घटनेची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. तसेच एनडीए हद्दीत शिवणे, उत्तमनगर, न्यू कोपरे या गावांची आराध्य दैवत असलेल्या काळुबाई देवस्थान, बापूज्जीबुवा देवस्थान, कमळादेवी देवस्थान आणि धनगरबाबा देवस्थान याची मंदिरे आहेत. या ठिकाणी वर्षानुवर्षे पूजा अर्चा सन उत्सव होत आले आहेत. परंतू 2107 पासून हे या ठिकाणी सण उत्सव करण्यासाठी परवानगी नाकारली आहे. या ठिकाणी पूजा अर्चा करण्यास व सण उत्सव साजरे करण्यास ग्रामस्थांना कायमस्वरुपी परवानगी मिळावी, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे.

Read More
  0 Hits

प्रिंट मिडिया

[robo-gallery id="181"]

Read More
  166 Hits

News 1

First News

Read More
  145 Hits

News 2

News Categeory 2

Read More
  194 Hits

News 3

Demo News 3

Read More
  167 Hits

News 2

Dummy New 4

Read More
  132 Hits

News

Categeory Baramati

Read More
  156 Hits