PTI03H 08M AGONationalist Congress Party MP Supriya Sule, on 28 May, accused the BJP-led Maharashtra government of trying to "promote" its "ideology" through education by using images of Prime Minister Narendra Modi on books recommended for supplementary reading in schools.Waving a book titled 'Chacha Chaudhary and Narendra Modi' at a press conference, Sule said, “I am happy that through these books the message of cleanliness is given to the students, however, what was the need to use PM Modi's large pictures on these books?”Sule said photos of Sant Gadgebaba, a 19th century mendicant-saint and social reformer from Maharashtra, or Mahatma Gandhi, who spread the message about cleanliness, should have been used on these books instead of those of Modi.The Maharashtra government had reportedly taken a decision to buy books worth Rs 59.42 lakh under the Sarva Shiksha Abhiyan (SSA) as a supplementary reading material for students which include the books on Chacha Choudhary and Modi series that can be read by the students in leisure time.“It is unfortunate that the government is trying to promote itself using education as a mean. Education should not be used for political gains but the government is doing it by bringing marketing into the education,” she said.Sule, daughter of NCP chief Sharad Pawar, said no political party had tried to promote its ideology through education in the past, "but this government is doing this which is unfortunate".The Baramati MP also sought clarification from state Education Minister Vinod Tawde over the government's decision to close down 1,300 schools run by Zilla Parishads across the state.After I spoke about the state government’s decision to close 1300 schools in the state, Tawdeji said I and Sharad Pawar were lying. But today, I have all the data with me and on the basis of the data and the media reports, I would like to seek clarification from the state government on what basis they are closing down or merging the schools in the stateSupriya SuleIn most of the villages where the decision to merge or close down the schools is taken the local residents are opposing it, she said. "I am not saying this. It is the school-wise report (sought from respective Zilla Parishads) which shows that in majority areas people are opposing it," she added.Tawde had said that a “false propaganda” was created over the closure of 1,300 schools which had recorded low enrollment.A few months ago, the government decided to close down over 1,300 schools on account of low number of students and poor education standards. The move drew criticism from various quarters.https://www.thequint.com/news/india/narendra-modi-in-chacha-chaudhury-books-maharashtra
https://www.youtube.com/watch?v=01U5-7tiIzM&feature=youtu.be
May 30, 2018 बंद शाळेवर राजकीय ‘ट्युशन’ काय कामाचीविठ्ठल जाधव, पुणेराज्यातील तेराशे शाळा बंद करण्याच्या निर्णयानंतरचे आता दुसरे वर्ष सुरू होत आहे. एक कि. मी. परिक्षेत्रात दुसरी शाळा असणाऱ्या ५६८ शाळांची घंटा गतवर्षी बंद झाली. या शाळा बंद करताना त्याला समायोजन हा सरकारी शब्द देण्यात आला. उर्वरित ५४१ शाळेतील विद्यार्थ्यांची वाहन व्यवस्था केली, तरच त्या समायोजित होऊ शकतात, असे सांगून शासनाने त्याचा निर्णय तूर्त थांबविण्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधी मंडळात सांगितले होते. प्रत्यक्षात १ कि. मी. अंतरापुढील शाळादेखील बंद केल्या गेल्या; परंतु त्या मुलांची पर्यायी व्यवस्था केली गेली नाही अथवा शासनाकडून वाहन व्यवस्थेचा कोणाताही निर्णय न झाल्याने दुर्गम वाड्या-वस्त्यांवरील बंद शाळांमधील विद्यार्थ्यांचे काय झाले? याचा शोध घेण्याची गरज असताना सध्या राज्यात बंद शाळा आणि राजकीयवरच ‘ट्युशन’ चर्चा रंगत आहे.एक किलो मीटरपेक्षा जादा अंतरातील शाळा बंद केल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला; तेव्हा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुळे खोटं बोलत आहेत. त्यांच्या अपचारामुळे बहुजन समाजातील मुले वंचित राहतील. त्यांचा डाव सरकार हाणून पाडील, असे वक्तव्य करून तावडे यांनी खरे तर मूळ विषयाला बगल दिली. या निर्णयातील एक वर्षानंतर समोर आलेले चित्र बघता एक कि. मी. परिक्षेत्रात शाळा नसताना दीड ते दोन कि.मी. अंतरावरील शाळाही बंद केल्याचे समोर आले आहे. याबद्दल खरेतर तावडे यांनी स्पष्ट भूमिका मांडायला हवी; परंतु विषयांतर करून उत्तर देण्यात पटाईत असणाऱ्या तावडे यांनी राजकीय वळण दिले. त्यावर खासदार सुळे यांनी त्यांचे म्हणणे मांडताना सोबत माजी शिक्षण संचालक वसंत काळपांडे यांना आणले होते. बोलण्याच्या ओघात सुळे यांनी काळपांडेकडे ‘ट्युशन’ लावावी असा टोला लगावला. त्याला मात्र, तावडे यांनी अवघ्या तासाभरात उत्तर देत मला बारामतीच्या ट्युशनची गरज नाही. तेथे धरणातल्या भ्रष्टाचाराने पाणी कसे आणायचे हे शिकवले जाते, अशी प्रतिक्रिया दिली. शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला; तेव्हा तावडे यांनी मी शिक्षकमंत्री नाही, तर शिक्षणमंत्री आहे असे सांगून मूळ विषय टाळला होता.शाळा बंद करण्याच्या धोरणाबद्दल मंत्री आणि सचिव या दोन्ही पातळीवर एक वाक्यता नसल्याने काही निर्णय चांगले असले, तरी ते वादाचे ठरतात. राज्यातील ८० हजार शाळा टप्प्याटप्प्याने बंद करणार असे सचिव नंदकुमार म्हणाले, नंतर त्यांनी माघार घेतली. शाळा बंद निर्णय असो की शिक्षकांच्या बदलांचे धोरण. याबद्दल शिक्षक किंवा कोणी व्यक्तीने प्रतिक्रिया दिली, तर ती सहन होत नसल्याचे दिसते. शिक्षकांना तर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास प्रतिबंध घातला गेला. तिखट प्रतिक्रिया देणारे २० ते २५ शिक्षक निलंबित झाले. ४० पेक्षा अधिक शिक्षकांना शोकॉज नोटीस देण्यात आल्या म्हणजे सरकारचे निर्णय लादले जातात. दुसरी बाजू ऐकूनच घेतली जात नाही. मंत्री आणि सचिवांचे हे धोरण असेल, तर खालची शिक्षण खात्याची यंत्रणा कशी असेल याचा फक्त विचारच केलेला बरा.राज्य सरकारच्या निर्णयानंतर १ कि. मी. पुढील शाळा बंद केल्या गेल्या ही वस्तुस्थिती आहे. निर्णयात नेमकी स्पष्टता नसल्याने यंत्रणेतही गोंधळ उडाला आहे. शिक्षण हक्क कायदा तथा आरटीईनुसार विद्यार्थ्यांचे घर ते शाळा हे अंतर मोजण्यात येते प्रत्यक्षात शाळा बंद करताना शाळा ते दुसरी शाळा हे अंतर मोजले गेले. यामध्ये आरटीईचा भंग झाला नाही का? शिक्षण विभागाने पुणे जिल्ह्यात ज्या शाळांना ‘अ’ दर्जा दिला. त्यातील ८ शाळा या नियमाने बंद झाल्या. याचा अर्थ निर्णयात त्रुटी आहेत. या निर्णयात सकारात्मक गोष्टीदेखील आहेत.८ ते १० मुलांची शाळा आणि ही मुले १०० ते १२५ विद्यार्थ्यांच्या शाळेत येऊन शिकणे यामध्ये फरक आहे. मोठ्या शाळेत त्यांना पायाभूत शैक्षणिक सुविधा, खेळ आणि शैक्षणिक वातावरण मिळणार. सहशिक्षणाचा फायदा होणार आहे; परंतु दुर्गम किंवा वाडी-वस्तीवरील या मुलांना मोठ्या शाळेत जाण्याची सोय न करता अथवा जबाबदारी न घेता शाळा बंद करून त्यांचे समायोजन होत असेल, तर सरकारला त्यात नेमके कोणते हशील आहेत, अशा वेळी सरकारकडून नेमकी स्पष्टता हवी. निर्णय घेतला म्हणून ते राबवायचा किंवा लादायचा हे धोरण ठेवणे गैर आहे.सरकारी किंवा जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या तथा पटाची घसरण थांबवून आता विद्यार्थी संख्या वाढू लागली आहे. सेमी इंग्रजी, ई-लर्निंगसारखे शिक्षण जि. प. शाळांमधूनही मिळू लागले परिणामी खासगी इंग्रजी शाळा त्यांचा खर्च आणि फी परवडत नसल्याने आणि त्याच दर्जाचे शिक्षण सरकारी शाळांमध्ये मिळण्याचा भरोसा पालकांमध्ये येऊ लागल्याने सरकारी शाळांकडे ओढा वाढतो आहे, अशा वेळी शिक्षणाचा दर्जा आणि सरकारी शाळांची बदनामी तरी होणार नाही याची खबरदारी नियंत्रण करणाऱ्या यंत्रणांनी घ्यायला हवी. बंद शाळांच्या निर्णयावर होणारी टोलेबाजी गांभीर्य घालवणारी आहे.http://www.saamana.com/decision-to-close-the-thirteenth-school-in-the-state/
Asking for sanitary pads you need an Akshay Kumar to talk about it. Purnima Sharma
Published On: Jun 05 2018 12:35PM | Last Updated: Jun 05 2018 12:35PM सरकारने शिक्षणात राजकारण करू नये पुणे : पुढारी ऑनलाईन गेल्या काही काळापासून शिक्षक आणि प्राध्यापक भरतीसाठी राज्यभर आंदोलने होत आहेत. परंतु, सरकारने अद्याप त्याची गांभिर्याने दखल घेतली नाही. सरकारने शिक्षणात राजकारण करू नये. प्राध्यापक भरतीवरील बंदी उठविण्याबाबत सरकारने त्वरीत योग्य ती पाऊले उचलावीत. तसेच त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सुप्रिया सुळे यांनी केले. पुण्यातील उच्च शिक्षण विभागाच्या शिक्षण संचालक कार्यालयापुढे सोमवार (दि. ५) पासून सेट, नेट, पीएचडी पात्रताधारकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. खासदार सुळे यांनी आज (दि.६) सकाळी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच याप्रकरणात आपण लक्ष घालून समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. पुण्यातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपुरातही पात्रताधारक धरणे आंदोलनाला बसले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही आमची मागणी निवदेन आणि आंदोलनाद्वारे सरकारदरबारी पोहचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, सरकारने त्याची योग्य दखल घेतली नाही. त्यामुळे आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे. कोणत्याही परिस्थितीत मागण्या मान्य झाल्याशिवाय आता मागे हटणार नाही, असे आंदोलक डॉ. किशोर खिलारे यांनी सांगितले. मुंबईतील बैठकीत निर्णयआंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. शिक्षण संचालक धनराज माने यांची सोमवारी आंदोलकांनी भेट घेतली. प्राध्यापक भरती बंदीबाबत आज मुंबईत सायंकाळी ५ वाजता शिक्षण आणि वित्त विभागाच्या सचिवांची बैठक होणार आहे. यावेळी याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले. http://www.pudhari.news/news/Pune/MP-supriya-sule-meets-SET-NET-Ph-D-qualified-protesters-in-pune/
सुप्रिया सुळे यांनी पाशा पटेल आणि प्रकाश आंबडेकर यांच्यावर साधला निशाणा लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 5, 2018 1:54 PM Without Allegations On Sharad Pawar They Does Not Get Publicity Says Supriya Sule महाराष्ट्राच्या राजकारणात मागील ५० वर्षाच्या इतिहासात शरद पवार यांच्यावर जोपर्यंत टीका केली जात नाही, तोपर्यंत काहींना प्रसिद्धी मिळत नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पाशा पटेल आणि प्रकाश आंबडेकर यांच्यावर निशाणा साधला. राज्यातील शेतकरी १ जून पासून त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी संपावर गेला आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काल शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठींबा देत टोकाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसल्याची भूमिका मांडली. त्यावर पाशा पटेल आणि प्रकाश आंबडेकर यांनी सडकून टीका केली. याच प्रश्नावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, राज्यातील शेतकरी संपावर गेले असताना सरकारने पाऊले उचलण्याची गरज आहे, सर्व परिस्थितीची जबाबदारी स्वीकारण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे होताना दिसत नाही अशी खंत त्यानी व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांनी अन्न वाया घालवू नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. रवीना टंडनने शेतकऱ्यांची चेष्ठा केली –प्रसिद्ध सिनेअभिनेत्री रवीना टंडन हिने शेतकऱ्यांबद्दल केलेल्या ट्विटविषयी विचारले असता, त्या म्हणाल्या एखाद्या महिलेने गरीब शेतकयाविषयी असे विधान करून त्यांची चेष्ठा केली आहे. हे पाहून अत्यत वाईट वाटले असून सरकारची किती लांगूलचालन करायची हे रवीना टंडन यांच्या विधानातून दिसत आहे, अशा शब्दात रविना टंडन यांना सुप्रिया सुळे यांनी सुनावले. शिक्षणात तरी राजकारण आणू नका –शिक्षक उपोषणास बसणे ही दुर्दैवाची बाब असून त्यावर हे सरकार कोणत्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसत आहे. या शिक्षकांनी मुख्यमंत्र्याना देखील अनेक वेळा पत्रव्यवहार देखील केला आहे. लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आम्ही आत्महत्या करण्याचा इशारा देणारे निवेदन देखील देण्यात आले आहे. हे निवेदन घेताना मुख्यमंत्री फोटो काढतात, यासारखी दुसरी वाईट गोष्टी नसल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षणात तरी राजकारण आणू नका आणि शिक्षकाचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा, अशी मागणी यावेळी केली. https://www.loksatta.com/maharashtra-news/without-allegations-on-sharad-pawar-they-does-not-get-publicity-says-supriya-sule-1691752/
एमपीसी न्यूज - भाजपची सत्ता असतानाही शरद पवार यांच्यावर टीका करावी लागते यातच सरकारचे अपयश दिसून येते. शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यावर टीका केली. केंद्रात दहा वर्षे कृषीमंत्री असूनही शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडविणारे पवार आता मात्र, शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यायचा सल्ला देत आहेत. त्यांना आता अचानक शेतकऱ्यांविषयी कळवळा निर्माण झाला आहे, असे आरोप पाशा पटेल यांनी सोमवारी केले होते. त्याला सुप्रिया सुळे यांनी प्रतिउत्तर दिले. http://www.mpcnews.in/latest-news/item/20400-sharad-pawar-does-not-get-publicity-without-criticism-supriya-sule
एमपीसी न्यूज - रविना टंडनचे वक्तव्य सरकारचे लांगुलचालन करणारे रविना टंडन या वास्तवतेपासून कोसो दूर आहेत.गरीब शेतकरी किती कष्ट करतात याची जाणीव एके महिलेला नाही याचे आश्चर्य वाटते. शेतकरी आंदोलन करतात म्हणून त्यांना जेलमध्ये घालावे, ही किती योग्य आहे. सरकारचे लांगुलचालन तरी किती करावे, याचा अतिरेक रविना टंडन यांच्या व्यक्तव्यातून दिसून येतो, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिनेत्री रविना टंडन हिच्या वक्तव्याचा समाचार घेतला.दोन दिवसांपुर्वी अभिनेत्री रविना टंडन हिने आंदोलन करणा-या शेतक-यांविषयी “अतिशय क्लेशदायक घटना आहे. आंदोलनाची ही पद्धत भीषण आहे. सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि साहित्याचं नुकसान करणे दुर्दैवी आहे. आंदोलकांना तातडीने अटक करावी आणि त्यांना जामीनही देऊ नये.” या आशयाचे ट्वीट केले होते. त्यानंतर रविनावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली होती. याच आधारे सुप्रिया सुळे यांनी रविनाला चांगलाच फैलावर घेत असे लोक वास्तव्यापासून कोसो दूर असतात, गरीब शेतकरी किती कष्ट करतात. याची जाणीवहा त्यांना नसते असे म्हटले आहे.दरम्यान, चोहोबाजुने टिका होत असताना रवीनाने आपल्या ‘त्या’ वक्तव्यावर सारवासारव करत आपल्या ट्वीटचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना नाही, तर शेतमालाची नासधूस करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, असं आपण म्हंटल्याचं रवीनाने स्पष्ट केलं आहे.http://www.mpcnews.in/top-news/item/20401-pune
पाशा पटेल आणि प्रकाश आंबडेकरांवर सुप्रिया सुळेंचा निशाणामुंबई : राज्यातील राजकारणाचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोपर्यंत टीका केली जात नाही, तोपर्यंत काहींना प्रसिद्धी मिळत नाही.खासदार सुप्रिया सुळे यांनी पाशा पटेल आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी सध्या संपावर गेला आहे. या संपा संदर्भात काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या या संपाला पाठींबा देत टोकाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रसिध्दी माध्यमांकडे बोलताना म्हटले होते. त्यानंतर पाशा पटेल आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी पवार यांच्या भूमिकेवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर खा.सुळे टीका केली. राज्यातील शेतकरी संपावर असताना राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारायला पाहिजे होती पण तसे झाले नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.http://www.mumbainagri.com/ncp-mp-supriya-sule-sharad-pawar-pash-patel-prakash-ambedkar-farmers-issue-9139/
Protesters claim 11,500 teachers’ posts lying vacant across state; earlier pleas have fallen on deaf ears
Maharashtra Times | Updated: Jun 10, 2018, 05:35AM ISTम. टा. प्रतिनिधी, पुणे'प्राईमटाईम फाउंडेशन'च्या वतीने देण्यात येणारा यंदाचा 'संसदरत्न' पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आला. चेन्नई येथील 'आयआयटी'च्या सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल एम. के. नारायणन आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते सुळे यांना गौरविण्यात आले.यावेळी आयआयटी मद्रासचे संचालक भास्कर राममूर्ती, 'प्राईमटाईम फाउंडेशन'चे संस्थापक के. श्रीनिवासन आदी उपस्थित होते. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला असून, लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांना तो प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे हे नववे वर्ष आहे. या वर्षीच्या निवड समितीमध्ये खासदार आनंदराव अडसूळ व अर्जुन राम मेघवाल यांचा समावेश होता.संसदेतील अधिवेशनात संबंधित खासदारांचा विविध चर्चांतील सहभाग, सभागृहात परिणामकारकरीत्या प्रश्न उपस्थित करून त्याचा केलेला पाठपुरावा, सभागृहात त्यांनी मांडलेली खासगी विधेयके आणि आपल्या मतदारसंघात खासदार निधीचा केलेला योग्य वापर या निकषांवर 'संसदरत्न' पुरस्कारासाठी निवड केली जाते. पुरस्कार स्वीकारताना सुळे म्हणाल्या, 'माझ्या मतदारसंघातील आणि राज्यातील जनतेचा विश्वास यांच्या बळावर संसदेत मला त्यांचे प्रश्न मांडता आले. हा सन्मान माझ्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा आहे. हा पुरस्कार मला जनतेलाच समर्पित करताना आनंद होत आहे.'https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/mp-supriya-sule-got-sansad-ratna-award/articleshow/64523594.cms
- सुप्रिया सुळे, खासदार : शनिवार, 9 जून 2018अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असणारे मुंबईचे शिवाजी पार्क १० जुन १९९९ रोजी देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. मुंबईच्या रस्त्यांवर दुतर्फा कार्यकर्त्यांची गर्दी होती. सर्वत्र जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. मुंबईनगरी उत्साहाने सळसळत होती, याचे कारण म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार असणारे आणि देशातील मोठ्या नेतृत्त्वापैकी एक असणारे शरद पवार साहेब नव्या पक्षाची घोषणा करणार होते. लोक मोठ्या उत्कंठेने त्यांच्या भाषणाची वाट पाहत होते. साहेब भाषणाला उभे राहताच त्यांच्या जयजयकाराने अवघे शिवाजीपार्क अक्षरशः दुमदुमून गेले. आपल्या नेहमीच्या शैलीत साहेबांनी भाषणाला सुरुवात केली. साहेब म्हणाले, "दिल्लीमध्ये महाराष्ट्राची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी पराकाष्ठा करण्याची शपथ मी आपणा सर्वांच्या साक्षीने घेतो. नवा इतिहास निर्माण करण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीत आणि तुम्हा सर्वांच्या मनगटात आहे. आणि त्यावर माझा विश्वास आहे." देशाला एक नवा विश्वास देताना साहेब पुढे म्हणाले, "सर्व जातींच्या आणि धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन भारतीयांची एक जबरदस्त शक्ती निर्माण करण्यासाठी आज पुन्हा एकदा नव्याने महात्मा गांधींचा विचार घेऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी मार्गस्थ होत आहे." पक्षाची स्थापना करताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा साहेबांनी दिलेला शब्द पक्षाच्या आजवरच्या वाटचालीत खरा करुन दाखविला आहे. साहेबांनी शिवाजीपार्कवरील त्या भाषणाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला समतेचा वस्तुपाठ हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीची शिदोरी असेल असे स्पष्टपणे नमूद केले होते. ही शिदोरी पाठीशी बांधूनच राष्ट्रवादीने आपली वाटचाल कायम ठेवली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मूल्याधिष्ठीत राजकारणाचा वसा घेऊन शरद पवार साहेब गेली अर्धा शतकाहून अधिक काळ राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या काळात झालेली विविध क्षेत्रातील कामे जनतेच्या लक्षात आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार असो सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने बहुजनांच्या मतांचा आदर करण्यात पवार साहेब नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. सहकारातून समृद्धीचा राजमार्ग प्रशस्त करताना खेड्यापाड्यातील जनता सुखी आणि समृद्ध व्हावी याकडे त्यांनी आवर्जून लक्ष पुरविले. आपल्या मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळात देशातील कृषीव्यवस्था अधिकाधिक बळकट व्हावी आणि त्याव्दारे शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी पोषक निर्णय घेतले. त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात एकेकाळी धान्य आयात करणारा आपला देश केवळ अन्नधान्याबाबत स्वयंपूर्णच झाला नाही तर अन्नधान्याची निर्यात करणारा एक प्रमुख राष्ट्र बनला. शेतीच्या क्षेत्रात मुलभूत संशोधनांना गती देण्याचे कार्यही त्यांच्याच काळात आवर्जून हाती घेण्यात आले. अन्नप्रक्रीया क्षेत्राला चालना देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान इतिहासाला टाळताच येणार नाही. हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्त्व असणाऱ्या नेत्याने आजवर केलेल्या कामाचा जनतेला दीर्घकालीन फायदाच झाला आहे. म्हणूनच विकास कार्याबाबत शरद पवार हे अधिक विश्वासार्ह नाव आहे, याची जनतेला खात्री आहे. प्रत्यक्ष अनुभवातून देशभरात याची प्रचितीही आलेली आहे. म्हणूनच त्यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला अल्पवधीतच जनतेची पसंती मिळाली. खरेतर पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्याची बांधणी करण्यात दशकांचा कालावधी जावा लागतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पक्कं केडर उभं रहावं लागतं. पण एखादा राजकीय पक्ष स्थापन झाल्यावर वर्षाच्या आत सत्तेवर येतो आणि त्यानंतर तब्बल दीड दशकं अर्थात पंधरा वर्षे तो सत्तेच्या केंद्रस्थानी असतो हे क्वचितच घडतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत हे घडलं. पक्षाच्या स्थापनेस १९ वर्षे पुर्ण होत असताना आतापर्यंतच्या वाटचालीचे सिंहालोकन करणे आवश्यक ठरते. खरेतर १९-२० वर्षे हा काळ एखाद्या संघटनेसाठी फार मोठा काळ नाही. आता तर कुठे खरी सुरुवात झाली असून पक्षाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असा संदेश देणारी वेळ आहे. आजघडीला समाजाच्या प्रत्येक स्तरात पक्षाच्या कार्यकर्त्याचे अस्तित्त्व आहे. पक्षाकडे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, गेल्या चार वर्षांत त्याचे मजबूत जाळ्यात रुपांतर केले आहे. हे जाळे पवार साहेबांसारख्या कणखर आणि कर्तबगार नेतृत्त्वाखाली पुर्वीपेक्षाही अधिक सक्रीयतेने कार्यरत राहील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली सरकारने आपल्या दीड दशकांच्या शासनकाळात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी, आरोग्य, कुटुंबकल्याण, सामाजीक न्याय, क्रीडा, उद्योग, ग्रामीण आणि शहरी विकास, पायाभूत सुविधांचे जाळे, उर्जा क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर भारनियमनातून मुक्ती अशा क्षेत्रात सरकारने केलेली कामे अभूतपुर्व अशी आहेत. निसर्गाचे संकट ओढावल्यावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कधीच मागेपुढे पाहिले नाही. दुष्काळी परिस्थितीत बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने मोठी कर्जमाफी जाहीर केली. सध्याच्या सत्ताधाऱ्यांप्रमाणे शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी रांगेत उभे केले नाही. शेतकऱ्यांना शून्य अथवा कमी व्याजदराने शेतीसाठी पतपुरवठा कसा होईल याकडे लक्ष पुरविले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पुरविला. बचत गटाची व्यापक चळवळ चालवून महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविला. शैक्षणिक क्षेत्रात पहिलीपासून इंग्रजीसारखा...
संभाजी भिडेंसारखी माणसे आंबा खाल्ला तर अपत्यप्राप्ती होते असे म्हणतात. त्यांचे हे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 11, 2018 माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर अपत्यप्राप्ती होते असे वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. या वक्तव्यावर आता सोशल मीडियावरही टीका होऊ लागली आहे. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. एकीकडे तंत्रज्ञानाचा विकास होताना आपल्याला दिसतो आहे आणि दुसरीकडे संभाजी भिडेंसारखी माणसे आंबा खाल्ला तर अपत्यप्राप्ती होते असे म्हणतात. त्यांचे हे वक्तव्य दुर्दैवी आहे, महिलांचा हा अपमान आहे अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. माता होणे याचा प्रत्येक स्त्रीला अभिमान असतो. मलाही तो आहे, मात्र संभाजी भिडेंच्या वक्तव्यामुळे महिला वर्गाचा अपमानच त्यांनी केला आहे असे त्यांनी म्हटले आहे. देशात आणि राज्यात जे सरकार आहे त्यांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना विज्ञानावरच विश्वास नाही. देशाचे शिक्षण मंत्रीच म्हटले होते की डार्विनचा सिद्धांत खोटा आहे. अशा प्रकारची वक्तव्ये ऐकायला मिळत आहेत. ही बाब खरोखर दुर्दैवी आहे या वक्तव्यांचा मी एक महिला म्हणून निषेध करते असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. ज्या महाराष्ट्रात सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला त्याच महाराष्ट्रात आज महिलांचा अशा वक्तव्यांमधून अपमान केला जातोय. महिलांना समान अधिकार देण्याचे धोरण सर्वात आधी महाराष्ट्रात आले अशा महाराष्ट्रात महिलांचा या प्रकारे अपमान होणे अत्यंत खेदजनक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. संभाजी भिडे यांनी नेमके काय म्हटले आहे?माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असं अजब वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भाजप च्या मंत्री पंकजा मुंडे या काल पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हल्ला बोल आंदोलन नसून डल्ला मारो असे विधान केले आहे.या प्रश्नावर त्या म्हणाल्या की,लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकारी असून या पुढील काळात देखील राज्यातील अनेक भागात हल्ला बोल आंदोलन काढण्यात येणार आहे.असे सांगत भाजप ला या हल्ला बोल चा त्रास होत असल्याने अशा प्रकारचे विधान केले गेले आहे.अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी पंकजा मुंडे च्या विधानाचा खरपूस समाचार घेतला https://www.loksatta.com/maharashtra-news/sambhaji-bhides-statement-is-insulting-women-says-supriya-sule-1695041/
सकाळ वृत्तसेवा : 02.30 AMपुणे : आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सोमवारी केली. तसेच, सरदार मुजुमदार वाड्याच्या देखभाल-दुरुस्तीचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. ही दोन्ही कामे प्राधान्याने करण्यात येतील, असे आश्वासन राव यांनी या वेळी दिले.पुणे-मुंबई रस्त्यालगत मुळा नदीकाठी (वाकडेवाडी परिसर) येथील माधवराव शिंदे उद्यानालगत गदिमांचे स्मारक उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांत याठिकाणी केवळ सीमाभिंत उभारली गेली आहे. स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरू केलेले नाही. या पार्श्वभूमीवर गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. खडकवासल्यातील रखडलेल्या कामांसह विविध प्रश्नांसदर्भात सुळे यांनी राव यांची भेट घेतली.महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, विशाल तांबे, श्रीधर माडगूळकर, सुमित्र माडगूळकर, आलोक आंबेकर या वेळी उपस्थित होते. तेव्हा, गदिमांच्या स्मारकाचा मुद्दा मांडून ते का रखडले, याची विचारणा करण्यात आली. त्यातील अडचणी दूर करून तेथे प्रत्यक्ष काम सुरू करण्याची मागणी केली. गदिमांच्या स्मारकासाठी निधी देण्याची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून सुळे या करणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कसबा पेठेतील सरदार मुजुमदार वाड्याच्या भिंतीला तडा गेल्याने वाड्याला धोका निर्माण झाला असल्याने त्याच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबतही सुळे यांनी चर्चा केली.महापालिकेत नव्याने आलेल्या गावांमधील रहिवाशांना अजूनही सेवा-सुविधा मिळत नाहीत. प्रामुख्याने रस्ते, पाणी, कचरा आणि आरोग्य आदी सुविधा पुरविण्याची गरज आहे. यासाठी महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून पावले उचलावीत.सुप्रिया सुळे, खासदारhttp://www.esakal.com/pune/complete-memorial-g-d-madgulkar-immediately-123105
Published On: Jun 12 2018 10:08AM | Last Updated: Jun 12 2018 पुणे : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 'भावरंग' रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. यावेळी, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, अभिनेत्री गिरीजा प्रभू, साहित्य, कला, सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, शहराध्यक्ष बाबा पाटील, प्रवक्ते योगेश सुपेकर उपस्थित होते. रांगोळीकार सोमनाथ भोंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कलादालनात २१ पोट्रेट रांगोळ्या साकारल्या आहेत. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी साहित्य, कला व सांस्कृतिक विभागातर्फे या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. http://www.pudhari.news/news/Pune/Rangoli-exhibition-on-the-anniversary-of-NCs-party/
पुणे महापालिकेत शहराच्या विवीध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी म्हणून खासदार सुळे यांनी सोमवारी सकाळी आयुक्त सौरव राव यांचु भेट घेतली. त्यावेळी त्या पत्रकारांशी बाेलताना त्यांनी राज्यसरकारवर सडकून टीका केली. By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: June 11, 2018 | Updated: June 11, 2018पुणे: गेले ४ वर्षे शरद पवार सत्तेत नाहीत. मात्र तरीही टीका करायला तेच लागतात, कारण त्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार यांच्या टिकाकारांचा समाचार घेतला. पुणे महापालिकेत शहराच्या विवीध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी म्हणून खासदार सुळे यांनी सोमवारी सकाळी आयुक्त सौरव राव यांचु भेट घेतली. बैठकीनतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी केंद्र व राज्य सरकार वर सडकून टीका केली. डार्विनचा सिद्धांत चुकीचा असे या़चे शिक्षणमंत्री म्हणत असतील तर काय बोलायचे असा प्रश्न करून सुळे म्हणाल्या, या सरकारचा व विशेषतः पंतप्रधानांच्या भवताली असणाऱ्यांचा विज्ञानावर विश्वासच नाही असे वाटते. त्यामुळे त्यांना कधी सीता टेस्ट ट्यूब बेबी वाटते तर कधी भारतात पुर्वी सगळे होतेच असे सांगितले जाते. काहीही आधार नसलेले बोलले जात आहे. महिलांविषयी बेताल वक्तव्ये केली जात आहेत. हे बरोबर नाही. त्यांना उत्तर द्यायचीही गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन राज्याच्या सर्व भागात होत आहे. पुण्याचे रविवारी झाले आता कोकणात होणार आहे. नंतर नाशिकला घेतले जाईल. जनताच या सरकायच्या विरोधात चालली आहे. शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका केली जाते, मात्र त्याला तेही कधी उत्तर देत नाहीत व मीही देणार नाही. जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण अशा सुसंस्कृत नेत्यांचे संस्कार पवार साहेब व नंतर आमच्यावर झाले आहेत, त्यामुळे टीकेची पर्वा करत नाही, सत्तेत येवून चार वर्ष झाली तरीही टीका करण्यासाठी अजून पवारच लागतात यावरून त्यांचे महत्त्व समजते असे सुळे म्हणाल्या. समाविष्ट 11 गावांमध्ये रस्ते पाणी आरोग्य अशा मुलभूत समस्यांवर काम होण्याची गरज आहे. 8 महिन्यांनतरही पालिका काही करत नाही असेच चित्र आहे. आयुक्तांनी लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती सुळे यांनी दिली. महाकवी गदिमा यांचे स्मारक ही गोष्ट महापालिकेला अभिमानाची वाटली पाहिजे. सगळ्या महाराष्ट्राला समाधान वाटेल असे त्यांचे स्मारक इथे व्हायला हवे. त्यावर काही होत नाही हे खेदजनक आहे असे सुळे यांनी सांगितले. आयुक्तांना त्याविषयीही सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नगरसेवक विशाल तांबे, सचिन दोडके, योगेश ससाणे आदी सुळे यांच्यासमवेत होते. http://www.lokmat.com/pune/though-pawar-not-power-he-needs-criticized/
गावांच्या विकासासाठी आयुक्तांची भेट – पंकजा मुंडे यांच्यावरही टीकास्त्र प्रभात वृत्तसेवा -June 11, 2018 | 8:38 pmपुणे – “शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा खासदार सुप्रिया सुळे यांनी निषेध केला असून, भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचा महिलांविषयी द्वेष दिसून येतो असे मत सुळे यांनी सोमवारी व्यक्त केले.यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, विशाल तांबे, सचिन दोडके, योगेश ससाणे आदी नगरसेवक उपस्थित होते.बारामती मतदार संघात येणाऱ्या पुणे महापालिका हद्दीतील गावांतील प्रश्नांसंदर्भात सुळे यांनी आयुक्त सौरभ राव यांची सोमवारी भेट घेतली त्यांनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.प्रत्येक महिलेला आई असण्याचा अभिमान असतो; मला देखील तो आहे. त्यामुळे भिडे यांनी केलेले विधान हे निषेधार्थ असून त्यांच्या या बेताल वक्तव्यावरून त्यांचा महिलांविषयक द्वेष दिसून येतो, अशी टीका सुळे यांनी केली. राष्ट्रवादीचे हे आंदोलन “हल्लाबोल’ नसून “डल्ला मारो’ आहे असे विधान महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते. त्याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकारी आहे. भाजपला “हल्लाबोल’आंदोलनाचा त्रास होत असल्यानेच अशाप्रकारचे विधान त्यांच्याकडून केले जात आहेआयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेबद्दल सुळे म्हणाल्या, “समाविष्ट 11 गावांमध्ये रस्ते पाणी आरोग्य अशा मुलभूत समस्यांवर काम होण्याची गरज आहे. गावे समाविष्ट होऊन आठ महिने झाले, तरी महापालिका काहीच करत नाही असेच चित्र आहे. या गावांच्या विकासाबाबत आयुक्तांनी लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे. कवी ग. दि. माडगुळकर यांचे स्मारक ही गोष्ट महापालिकेला अभिमानाची वाटली पाहिजे. सगळ्या महाराष्ट्राला समाधान वाटेल, असे त्यांचे स्मारक येथे व्हायला हवे. परंतु तसे होत नाही हे खेदजनक आहे, अशी टीका सुळे यांनी केली. आयुक्तांना याविषयीही सांगितल्याचे त्या म्हणाल्या.म्हणून शरद पवारांना लक्ष केले जातेबोलण्याचा आणि टीका करण्याचा आधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, व्यक्तिगत टीका करण्याचे संस्कार आमच्यावर नाहीत. शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही, म्हणून काही लोक शरद पवार यांना लक्ष करतात, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.पंतप्रधानांना पत्र लिहणारकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे महत्त्व कमी करण्याचा केंद्राने घेतलेला निर्णय चुकीचा आणि दुर्दैवी आहे. या परीक्षेमुळे गुणवत्तापूर्ण आणि कार्यक्षम अधिकारी देशाला लाभतात. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा मी निषेध करत आहे. या परीक्षेचे महत्त्व कमी करू नये, यासाठी लवकरच आपण पंतप्रधानांना पत्र लिहिणार असल्याचे खासदार सुळे म्हणाल्या.http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D/
ST Correspondent : 01.36 PM Supriya_SulePune: NCP MP Supriya Sule criticised the BJP government for lacking a scientific approach and said leaders associated with the party make foolish statements as a result of this. Sule was interacting with the media during her visit to Pune Municipal Corporation (PMC) on Monday.Sambhaji Bhide, founder of Shiv Pratishthan Hindustan (SPH), who was accused for his alleged role in the Bhima-Koregaon riots, made a statement in Nashik that those who eat mangoes from his farm are blessed with a kid. Reacting to it, Sule said, “BJP’s union ministers do not believe in Darwin’s theory. People around the Prime Minister do not believe in science. So they make statements like Sita is the first test tube baby. Now, look at this statement, if a woman eats mangoes from Bhide’s farm, she will get pregnant. BJP leaders make foolish statements one after the other.”She added, “NCP will conduct a ‘Halla Bol’ agitation in different parts of the State. There is a strong anti-government sentiment against the current government.”On Monday, Sule met Pune Municipal Commissioner Saurabh Rao to discuss the lack of facilities at eleven villages recently merged with the PMC. She alleged, “After eight months of the merger, the PMC has not done anything for these 11 villages. There is no basic infrastructure like water, roads, sanitation, health, etc.”She also demanded that well-known Maharashtrian poet GD Madgulkar’s memorial be built along Mutha River near Wakad, besides the Madhavrao Shinde Garden. NCP leader of Opposition in PMC Chetan Tupe was present for the meeting. Rao gave an assurance that all works would be completed soon.http://www.sakaltimes.com/pune/%E2%80%98bjp-leaders-make-foolish-statements-party-doesn%E2%80%99t-believe-science%E2%80%99-19608
Vijay Chavan, Pune Mirror | Updated: Jun 12, 2018, Assures better coordination between different authorities to address issues related to road, water and sanitation; irate residents seek results instead.After time and again approaching the civic authorities in a span of four years to get their woes addressed, the residents of housing societies in Mahalunge finally saw a ray of hope recently. Things took a positive turn when the locals wrote to the Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) and the Prime Minister’s Office (PMO). Subsequently, guardian minister Girish Bapat, member of Parliament (MP) Supriya Sule, district collector Naval Kishor Ram, PMRDA commissioner Kiran Gitte, zilla parishad chief executive officer (CEO) Suraj Mandhare and other civic officials visited the affected area to find out the problems pointed out by the locals. On May 20, 2018, we carried a report, titled, ‘This is a road to death for locals of Mahalunge’, stating the government’s apathy and the voices raised by the residents. On June 7, 2018, we carried another report, titled, ‘We’ll give up our Aadhaar cards if basic amenities are not given’, reporting that the locals gave a deadline of three months to resolve their issues after which they would return their Aadhaar cards to the authorities. During the recent visit to the area, the minister as well as civic officials assured them to resolve the problems of road connectivity and garbage. For starters, the PMRDA officials even handed over five ghanta gaadis (garbage collecting trucks) to the Mahalunge gram panchayat. Talking to Mirror,Bapat said, “The village has been included in the Town Planning (TP) scheme. Before going ahead with the development of the area, basic amenities such as better road, water supply and regular garbage collection will be provided on priority basis. We have also assured the residents that the village will be connected to the remaining city and that all the woes will be addressed. The roads will be made pothole-free.” The minister continued, “There needs to be coordination between different authorities, who are responsible for road, water and sanitation. The locals, too, need to cooperate with the newly-built housing societies.” To this, Gitte added, “Initially, we will be solving issues related to the garbage in the area. We have also made arrangements of ghanta gaadis for this. We are also negotiating with the villagers to solve problems related to road and land acquisition.” Meanwhile, residents say they are happy that their letter bore fruit but expect positive results at the earliest. Aditya Kumar Gupta, a resident of Saarrthi Souvenir, said, “The visit of the minister and senior civic officials has certainly brought some hope for us, but we want firm decisions and not just false assurances. We have been getting such assurances for four years now. We are fed up.” Over 5,000 residents near Vibgyor High School in Mahalunge-Balewadi are facing serious problems due to absence of road, proper sanitation, water supply and street lights. They have even started circulating resolutions, stating that members of housing societies will not pay any tax to the government, including property tax and income tax, if they were not given any facilities. The societies that are mostly affected are Teerth Towers, Saarrthi Souvenir, Jardin, Anandvan, Yashwin, Sanjeevani, Neelmani Pinnacle, Sangam Phase I and Phase II, My Nest, Ilina, among others. https://punemirror.indiatimes.com/pune/civic/guardian-minister-looks-into-mahalunge-troubles/articleshow/64550222.cms
पुणे, दि. १५ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून यशस्विनी सामाजिक अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेला खाद्य महोत्सव आजपासून धनकवडी येथे सुरू झाला. धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय केंद्र येथे रविवार पर्यंत हा महोत्सव चालू राहणार आहे.ग्रामीण भागातील गरजू आणि कष्टकरी वर्गातील महिलांना रोजगार मिळावा, तसेच त्यांनी तयार केलेल्या खाद्य पदार्थांना योग्य ती बाजारपेठ मिळावी म्हणून सुळे यांनी याच महिलांच्या बचत गटाद्वारे विविध ठिकाणी खाद्य महोत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. ही संकल्पना पुण्यात आता चांगलीच रुजत असून आज धनकवडी येथे सुरू झालेल्या या महोत्सवाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यापूर्वी वारजे, सिंहगड रस्ता परिसर आणि कात्रज भागात हे महोत्सव झाले आहेत.धनकवडी येथील खाद्य महोत्सवाचे उद्घाटन सुळे यांच्या भगिनी रजनी इंदुलकर आणि नीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक विशाल तांबे, किशोर धनकवडे यांच्यासह अश्विनी भागवत, नरेंद्र पवार, विजया ठाकरे, आदी याप्रसंगी उपस्थित होते. या महोत्सवात नेहमीप्रमाणे लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यात आंबेगाव बुद्रुक येथील तेजल मरगजे यांनी पैठणी जिंकली असून ती खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.