महाराष्ट्र

देश

धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी, केंद्राने स्पष्ट करावे

लोकसभेत खासदार सुळे यांचा कडाडून हल्ला  दिल्ली, दि. २१ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र सरकार कष्टकरी धनगर समाजाला बदनाम करत आहे, असा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत भाजप आणि शिंदे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला. शिंदे गटाचे खासदार गावित हे धनगर आरक्षणाला विरोध करत आहेत, ही बाब लक्षात आणून देत भाजप आणि केंद्र सरकारने याबाबत...

Read More
  598 Hits

शिंदे-फडणवीस सरकारने धनगर आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी - सुप्रिया सुळे

 नवी दिल्ली : सध्या राज्यात आणि देशात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दोन्ही सत्ताधारी आणि विरोधक ऐकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणा मुद्दा उपस्थित केला. कालपर्यंत धनगरांना आरक्षण मिळायला हवे अशी शिवसेनेची (शिंदे गट) भूमिका होती. परंतु आज त्यांचे मंत्री राजेंद्र गावित हे धनगरांना आरक्षण न...

Read More
  622 Hits

धनगर आरक्षणाबाबत भाजप आणि शिंदे गटाची भूमिका दुटप्पी - सुप्रिया सुळे

पुणे : महाराष्ट्र सरकार कष्टकरी धनगर समाजाला बदनाम करत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज लोकसभेत भाजप आणि शिंदे गटाच्या दुटप्पी भूमिकेवर हल्ला चढवला. (Supriya Sule on Dhangar reservation). शिंदे गटाचे खासदार गावित हे धनगर आरक्षणाला विरोध करत आहेत, ही बाब लक्षात आणून देत भाजप आणि केंद्र सरकारने याबाबत आपल...

Read More
  642 Hits

धनगर समाजाची फसवणूक करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारने आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी - खासदार सुप्रिया सुळे

लोकसभेत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. कालपर्यंत धनगरांना आरक्षण मिळायला हवे अशी शिवसेनेची भूमिका होती, परंतु आज त्यांचे मंत्री राजेंद्र गावित हे धनगरांना आरक्षण नको असे म्हणाले. नेमकी धनगर आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका काय? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. धनगर समाजाशी खोटे आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आल...

Read More
  569 Hits

राज्यात BJP Shinde गटाकडून गलिच्छ राजकारण - सुप्रिया सुळे

 राज्यात BJP Shinde गटाकडून गलिच्छ राजकारण - सुप्रिया सुळे

Read More
  601 Hits

फुरसुंगीची कचराकोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री सरसावले

पुण्याला कचऱ्यामध्ये सोडून परदेश दौऱ्यावर गेलेल्या महापौर मुक्ता टिळक अखेर पुण्यात दाखल झाल्या आहेत. पुण्यातील कचराकोंडीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंदोलकांशी चर्चा करणार आहेत. उरळी देवाची आणि फुरसुंगीच्या आंदोलकांसोबक बिबवेवाडीत मुख्यमंत्र्यांची बैठक होईल. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि पालिकेचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दुपारी होणाऱ्या बैठकीत तरी पुण्याची कचराकोंडी सुटते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही रविवारी सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. फुरसुंगी आणि उरळी देवाची मधील कचरा प्रश्नावर तोडगा काढण्याचं निवेदन त्यांनी दिलं होतं. पुण्यातल्या कचऱ्याला आता राजकीय दुर्गंधीही येऊ लागली आहे. फुरसुंगीचा प्रश्न सुटला नाही, तर राजीनामा देईन, असा इशारा शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिला होता. येत्या 15 दिवसात तोडगा निघाला नाही, तर स्वत: फुरसुंगीकरांसोबत आंदोलनाला बसेन असंही शिवतारे म्हणाले होते. काय आहे पुण्याचा कचरा प्रश्न? पुण्यातील कचरा फुरसुंगी-उरळी या गावाजवळच्या कचरा डेपोत टाकला जातो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती. ही आग अनेक दिवस धुमसत असल्यानं फुरसुंगीकरांना जगणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे त्यांनी फुरसुंगीकरांनी पुणे शहरातील कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला आहे. इतकंच नाही तर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरु आहेत. 14 एप्रिलपासून फुरसुंगीकरांनी आंदोलन सुरु केलं आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पुणे शहरातून दिवसाला जवळपास 1700 मेट्रीक टन कचरा उचलला जातो. यापैकी जवळपास 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. राहिलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर फेकला जातो. त्यामुळे 1700 मधून 500 टन वजा केले तर राहिलेला 1200 टन कचरा गुणिले 19 दिवस केल्यास, 22 हजार टनांपेक्षा जास्त कचरा पुणे शहरात पडून आहे.

Read More
  807 Hits

कुठे गेल्या भाजपच्या मावशी, सुप्रिया सुळेंचा सरकारला टोमणा

शिवसेना भाजपशी काडीमोड घेणार हा मोठा जोक आहे, ते फक्त धमकी देतात, रुसतात आणि परत येऊन बसतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. त्या पंढरपूरमध्ये बोलत होत्या. शिवाय निवडणुकीआधी महागाईवर बोलणाऱ्या जाहिरातीतल्या मावशीच्या शोधात आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही चिमटे काढले. शिवसेना आणि भाजप धमक्या देतात, रुसतात आणि परत येतात त्यामुळे आता त्यांचा ‘कोल्हा आला रे आला’सारखी परिस्थिती बनली आहे, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. भाजप सरकार गेल्या 3 वर्षात अपयशी ठरलं असून, वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडलेले भाव पाहून सध्या मी भाजपच्या जाहिरातीमधील मावशीचा शोध घेत आहे, असा टोला सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. शिवाय पाशा पटेल यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत, पारदर्शी मुख्यमंत्री राज्यातील माध्यमांना न्याय देतील असा खोचक टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. कर्जमाफीबाबत सरकारवर ताशेरे ओढताना, आपल्याला कर्जतमध्ये एक तरुण भेटला, कर्जमाफीसाठी कागदे गोळा करायला त्याने 400 रुपये खर्च केले आणि त्याच्या 2 खात्यात केवळ 130 रुपये कर्जमाफीची रक्कम जमा झाली, असं सांगत आपण हा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असून, या सरकारने दिलेला शब्द पाळावा असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.  https://www.youtube.com/watch?v=XFGztIsLyzs  https://www.youtube.com/watch?v=pLsAqJEk9-0  कुठे गेल्या भाजपच्या मावशी, सुप्रिया सुळेंचा सरकारला टोमणा

Read More
  585 Hits