निफाड दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, समृद्धी महामार्गावरील लूट, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि कांदा प्रश्नावर भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांना कायदेशीररीत्या परत मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
समृद्धी महामार्गाची निर्मिती करताना सुरक्षिततेचा विचार केला गेला असे दिसत नाही. समृद्धी महामार्गावर सुधारणा का घडू शकत नाही, असा प्रश्न असून, हे प्रकार फक्त सरकारच्या हलगर्जीपणामुळे होत आहेत, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सुळे या पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची ...

