1 minute reading time
(82 words)
[ABP MAJHA]राज्यात महिलांच्या सुरक्षेबाबत गांभीर्य नाही- सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळेंनी आजच्या पत्रकार परिषदेत राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याची टीका केली. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत राज्यात वाढ झाली आहे. मुंबईतील रेल्वेत दिवसाढवळय़ा मुली-तरुणीवर अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. राज्याच्या गृहखात्याची निष्क्रियता या प्रकाराला जबाबदार आहे. महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराबद्दल हे सरकार गंभीर नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. मुंबईत धावत्या रेल्वेत विनयभंगाची घटना घडली आहे. हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. याला गृहखात्याची उदासीनता कारणीभूत ठरली आहे, अशी टीका सुळे यांनी केली.