1 minute reading time
(66 words)
[ABP MAJHA]विलासरावांची आठवण ते भूकंपग्रस्तांचं आरक्षण; सुप्रिया सुळेंचं भाषण
महाराष्ट्रातील किल्लारी येथे १९९३ साली झालेल्या महाप्रयलंकारी भूकंपास आज ३० वर्षे पुर्ण झाली. या आपत्तीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. सुळे यांनी यावेळी भाषण करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर महाराष्ट्राची लेक म्हणून आगामी काळात नागरिकांसाठी काम करू अशी ग्वाही दिली.