1 minute reading time
(76 words)
[TV9 Marathi]'हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे का विरोधात हे माहिती नाही'
सुप्रिया सुळे यांनी ईडीच्या कारवायांबाबत आपली भूमिका मांडताना त्यामागे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप केला. न्यायालयांनी ईडीवर ताशेरे ओढल्याच्या बातम्यांचा संदर्भ देत, संस्थेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्या म्हणाल्या. नवले ब्रिजजवळ घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, सुळे यांनी रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना संसदेत रस्ते सुरक्षेवर चर्चा घडवून आणण्याचे आवाहन केले आणि राज्यामध्ये महाराष्ट्र इज फॉर रोड सेफ्टी असा व्यापक कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

