1 minute reading time
(92 words)
[ABP MAJHA]हेगडेवारांचे विचार कमी होतायत, यशवंतराव चव्हाणांचे विचार चालतायत
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्रातील जनतेसाठी खुलं पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी शरद पवारांचा नामोल्लेख टाळत यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला होता. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांकडून आता यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा वापर केला जातोय, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. या चर्चांवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांचा उल्लेख न करता त्यांना कोपरखळी मारली आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत त्या बोलत होत्या.