1 minute reading time
(76 words)
[Lokshahi Marathi]पुण्यात सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद
'इंडिया' आघाडीमधून नितीशकुमार बाहेर पडले आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडणं हा नितीशकुमार यांचा वैयक्तिक निर्णय होता. लोकशाही आहे. त्यामुळे ते असे निर्णय घेण्यास स्वायत्त आहेत. मात्र मला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे एक वर्षापूर्वीचे भाषण आठवते. ज्यामध्ये ते नितीशकुमार यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद झालेत, असे म्हणाले होते. राजकीय विचारधारेचा विचार न करता दिलेला शब्द सतत फिरवायचा ही भाजपची पद्धत झाली आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.