1 minute reading time
(80 words)
[TV9 Marathi]पुण्यातील हळदी-कुंकु समारंभात खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण
अंगणवाडी आणि आशा भगिनीच्या कुटुंबाचा विमा काढण्यात यावा यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. कारण तुम्ही इतरांच्या आरोग्याची काळजी घेता, त्यामुळे आपल्याही आरोग्याची काळजी गरजेचे असल्याचे मत मांडले. कोरोना काळात तुम्ही केलेले काम अतिशय महत्वाचे होते. त्याकाळात आम्हाला तुमच्यात पांडुरंगाचे दर्शन होत होते. अनेक अडचणींवर मात करुन आपल्या भगिनींनि ती जबाबदारी पार पाडली. तुमच्यामुळे आम्ही आज जिवंत आहोत, त्यामुळे आपला सन्मान झालाच पाहिजे. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. अंगणवाडी व आशा भगिनी सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या.