1 minute reading time
(68 words)
[LOKMAT]गोळीबार करणाऱ्या भाजपच्या आमदारानं केलेल्या आरोपांची चौकशी करा
आरबीआयने केलेल्या पेटीएमवरील कारवाईवरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत नोटाबंदीचा विषय काढला.नोटाबंदीनंतर जर पेटीएमधून अफरातफर केली जात होती तर सरकारने काय पाऊले उचलली? असा सवाल सुळेंनी केला.मोदी सरकारने नोटाबंदी केली तेव्हा सर्वाधिक जाहिराती या पेटीएमच्या होत्या असा सुळे म्हणाल्या.एवढी वर्षे सरकार काय करत होते, असा सवाल सुळे यांनी केला आहे.भ्रष्टाचाराबद्दल बोलताना सुप्रिया सुळेंनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशी मागणी केली.