1 minute reading time (85 words)

[Maharashtra Times]महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत, सरकारने मदत करावी

महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत, सरकारने मदत करावी

खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. तर राज्यातील शेतकर्‍यांना आर्थिक मदतीची गरज असून, जुने कर्ज माफ करून... नवीन कर्ज देण्याची मागणी सुप्रियाताई सुळे यांच्याकडून करण्यात आली आहे. काही जिल्ह्यात गारांचा पाऊस झाल्याने ओला दुष्काळ पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी यंदा पाऊसच झाला नाही. त्यामुळे अशा ठिकाणी कोरडा दुष्काळ पडला आहे. वातावरण बदलामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. द्राक्ष, कांदा, केळी, गहू, धान, कापूस, सोयाबीनसह पाल्याभाज्यांचे नुकसान झाले आहे.

[my mahanagar]ममतादीदी आमच्याच सोबत – सुप्रिया सुळ...
[ABP MAJHA]महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याचं कर्ज माफ...