1 minute reading time (94 words)

ट्रिपल इंजिन सरकारमुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय-सुप्रिया सुळे

ट्रिपल इंजिन सरकारमुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय-सुप्रिया सुळे

महाराष्ट्रासह गुजरातमधील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं आहे. पुणे, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, अहमदनगर परिसरात गारपिटीसह पाऊस कोसळला आहे. यामध्ये रब्बी हंगामातील ज्वारी, भुईसपाट, भाजीपाला, तूर, हरभरा अशा पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे."महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी ही मोठी आणीबाणीची परिस्थिती आहे. या अशा कठीण काळात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आपले पाहणी पथक पाठवून परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांसाठी मदतीची आग्रही मागणी करायला हवी. "

[Saam TV ]सुप्रिया सुळे यांचं संपूर्ण भाषण!
[Times Now Marathi]खासदार सुप्रिया सुळेंकडून 26/11...