1 minute reading time
(71 words)
[ABP MAJHA]शिवसेना,राष्ट्रवादी, फडणवीसांविरोधात केंद्रातील अदृष्य हात काम करतोय
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मानसाला जवळ करून शुन्यातून शिवसेना उभी केली. शरदचंद्र पवारांनीही राष्ट्रवादीची स्थापना करून महाराष्ट्रात मराठी मानसाला क्षमतेपेक्षा जास्त बहुमान मिळवून दिला. महाराष्ट्रातील या मराठी मानसांच्या पक्षांना संपविण्याच्या कटात दिल्लीचा अदृष्य हात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.त्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून, नागपुरात पक्षाचा मेळावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी याच अदृष्य हाताने एका मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री आणि हाफ मुख्यमंत्री बनविल्यावरून देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला.