1 minute reading time (92 words)

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांचा राज्याच्या गृहमंत्र्यांना सवाल

सुप्रिया सुळे यांचा राज्याच्या गृहमंत्र्यांना सवाल

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत. त्यांची घरे जाळली जात आहेत. आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस दिवस तीव्र होत आहे.‌याकाळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे.परंतु हे महोदय छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. यापुर्वी देखील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेंव्हा हे महाशय राज्यात उपलब्ध नव्हते. अगदी नागपूर पाण्यात बुडाले तेंव्हा देखील ते मुंबईत हायकमांडची सेवा करण्यात बिझी होते. त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा राज्यातील जनतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा उदासीन आणि आकसपूर्ण आहे हे यानिमित्ताने उघड झाले आहे. अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

[Times Now Marathi]सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर ...
[lokmat]"सत्यमेव जयते... सर्वोच्च न्यायालयाच्या नि...