1 minute reading time
(95 words)
[Saam TV]नागपूर येथील महापुरावरुन सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल
नागपूरसह परिसरात शनिवारी झालेल्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला. कालच्या पावसात नागपूरमधील अंबाझरी तलाव परिसरात चार तासात 100 मिलि मीटर पाऊस झाला. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो (Ambazari Lake overflow) होऊन तलावाचे पाणी 10 हजारपेक्षा जास्त घरातून शिरल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीवरूनच आता राजकारण तापले आहे. एकीकडे नागपूरमध्ये पूरस्थिती सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे असूनसुद्धा देवेंद्र फडणवीस (Dcm Devendra Fadnavis) मात्र राजकीय व्यस्त होते. या परिस्थितीही लोकांना वाऱ्यावर सोडणे चुकीचे असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya sule) यांनी ट्विटद्वारे (tweet) केली आहे.