1 minute reading time (108 words)

[TV9 Marathi ]राज्यातल्या दूषित वातावरणाला खोके सरकार जबाबदार - सुप्रिया सुळे

राज्यातल्या दूषित वातावरणाला खोके सरकार जबाबदार - सुप्रिया सुळे

सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या, म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्‍वास नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांवर केली आहे. सुप्रिया सुळे मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना राज्य सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसानसंदर्भात सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणार आहे. आमचे सगळे पदाधिकारी सर्व राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याला आणि काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी सुळेंनी राज्य सरकारकडे केली आहे.

[ABP MAJHA]शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत सरसकट कर्ज...
[TV9 Marathi]'अंतरवाली सराटीमधील घटना म्हणजे गृहमं...