1 minute reading time
(83 words)
[TV9 Marathi]'रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, तर क्रिकेट कसे एकत्र खेळता?"
सध्या संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये सुरु असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेत 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यावरुन देशभरात राजकारण तापलं आहे. यावर आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपलं मत व्यक्त करत केंद्र सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुणे जिल्हा परिषदेत भेट देत मतदारसंघातील कामाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

