1 minute reading time
(78 words)
[TV9 Marathi]गृहमंत्र्यांनी झेपत नसल्यास राजीनामा द्यावा-सुप्रिया सुळे
संभाजीनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी राडा झाला. दोन गटात तुफान हाणामारी झाली. दगडफेक करण्यात आली. जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे संभाजी नगरमध्ये तणाव पूर्ण शांतता पसरली होती. अजूनही संभाजीनगरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. संभाजीनगरपाठोपाठ मुंबईतील मालवणीतही दोन गटात राडा झाला. या सर्व राड्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात दंगल झाली आहे. या गोष्टी गंभीर आहेत. त्यामुळे झेपत नसेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीच सुप्रिया सुळे यांनी केली आहे.