1 minute reading time (128 words)

महाराष्ट्रात कायद्याचा धाक उरला नाही : सुप्रिया सुळे








सरकारनामा ब्युरो

शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

बारामती : राज्यातील रोडरोमिओंची हिम्मत लेकींच्या अब्रु लुटण्यापर्यंत वाढली आहे. या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही असा संतप्त सवाला खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. 


पुण्याच्या हिंजवडी परिसरात बारा वर्षीय दोन मुलीवर बलात्कार झाला, त्यापैकी एका मुलीचा मृत्यू झाला ही घटना धक्कादायक व मन सुन्न करणारी असल्याची प्रतिक्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना टॅग करीत राज्याचे गृहमंत्रालय महिला सुरक्षेबाबत पूर्णत: निष्क्रीय ठरले असल्याची टीका सुळे यांनी केली आहे.

रोडरोमिओंची हिम्मत इतकी वाढते याचा अर्थ या राज्यात कायद्याचा धाकच उरलेला नाही हे सिद्ध होते असे सुळे यांनी म्हटले आहे. गेले काही दिवस राज्यातील महिलांवर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य करीत कायदा व सुव्यवस्‌तेच्या परिस्थिीतवर गंभीर टीका केली आहे.

http://www.sarkarnama.in/supriya-question-law-and-order-state-28898
सुप्रिया सुळेंनी फेसबुक लाईव्हवरून मांडली रस्त्यां...
या राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? सुप्रिया स...