1 minute reading time (99 words)

[TV9 Marathi]'कांद्याला भाव नाही, सरकार पूर्णपणे अपयशी'- सुप्रिया सुळे

'कांद्याला भाव नाही, सरकार पूर्णपणे अपयशी'- सुप्रिया सुळे

 विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांच्या वाढत्या कारवायांनंतर प्रादेशिक पक्षाच्या ९ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे. भारत अजूनही लोकशाही देश असल्याच्या मतांशी तुम्ही सहमत असाल अशी अपेक्षा आहे. विरोधी पक्षातील नेत्यांविरुद्ध केंद्रीय यंत्रणांचा होत असलेल्या गैरवापरावरून असं दिसत आहे की, आपण लोकशाहीतून निरंकुशतेकडे वाटचाल करत आहोत, असं या पत्रात लिहिण्यात आलंय. यावर भाष्य करताना सुप्रिया सुळेंनी आपली प्रतिक्रिया दिलीय. यावेळी सुप्रिया सुळेंनी कांद्यावरून सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. 'कांद्याला महाराष्ट्रात भाव नाही, पण जगात भाव आहे. त्यामुळे यावर एकत्र येऊन काहीतरी निर्णय घ्यायला हवा होता, यावरून केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरतंय हे दिसतंय." असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

[Saam TV]महिलांना स्फुर्ती देणारं सुप्रिया सुळे या...
[Sakal]वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घ्यावा - स...