By Editor on Monday, 29 January 2024
Category: Uncategorized

[TV9 Marathi]फडणवीसही म्हणाले होते, बिन लग्नाचा राहिल पण राष्ट्रवादीशी युती करणार नाही

 बॅचलर राहील परंतु राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केले होते. मात्र नंतर त्यापासून त्यांनीही फारकत घेतली. एखादा माणूस विरोधात असताना भाजपकडून त्याच्यावरती टोकाची टीका केली जाते. इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यासारख्या संस्थांचा वापर करून माणसं, पक्ष फोडून भाजपची सत्ता कशी आणली जाईल? यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे भाजपला कोणत्याही प्रकारची नैतिकता राहिली नसल्याचा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.

Leave Comments