मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या राज्याचे गृहमंत्री करताय तरी काय? राज्याच्या गृहमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे. मला असं वाटतं राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही सर्व रेकॉर्ड काढून बघा गेले एक महिन्याभर सातत्याने मी गृहमंत्रालयासोबत पत्र व्यवहारकरून सांगत आहे. आज एका आमदाराच्या घरावर असा हल्ला होणार असेल तर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. ही गृह मंत्रालयाची आणि यात ट्रिपल इंजिन खोके सरकारची नैतिक जबाबदार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.