राज्यातील आमदारांच्या घरावर हल्ला होतोय, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवली आहे, हे राज्य सरकारचे अपयश असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. मराठा आंदोलन हे गृहमंत्र्यांना (Devendra Fadanvis) झेपत नाही, त्यामुळे त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा अशी मागणीही सुळे यांनी केली.