माझी लढाई फक्त भाजपाविरोधातनातं एकीकडे आणि राजकारण दुसरीकडे' हे पवार कुटुंबीय अनेकदा सांगत आले आहेत. पवार कुटुंबीयांकडून असे सांगण्यात जरी येत असले तरी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) कधीही अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केली नाही. अजित पवारांच्या प्रश्नावर त्यांनी कायम मौन बाळगणे पसंत केले आहे. त्यामुळे खरी फूट पडली आहे का हा नेहमीच प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडत असतो. आता आज सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया उंचवल्या आहे. माझी लढाई अजित पवार गटांसोबत नाही, असे सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केल्यानंतर राजकीय चर्चंना उधाण आले आहे.