महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधलाय. तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्यावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय. एवढंच बोलायचं अन् निघायचं हीच लाईन राज्य सरकारची लाईन असल्याची टीका त्यांनी महायुती सरकारवर केलीय.