By Editor on Tuesday, 30 January 2024
Category: महाराष्ट्र

[ABP MAJHA]भुजबळांचं कॅबिनेटमधे ऐकलं जात नसेल तर हे दुर्दैव : सुप्रिया सुळे

मराठा समाजाला आरक्षणासंदर्भातील अध्यादेश राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. ज्यामुळे मराठा समाजाने आरक्षणाची लढाई जिंकली आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. परंतु, यामुळे राज्य सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी त्यांनी उघडपणे बोलून देखील दाखवली आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून देखील कॅबिनेट त्यांचे काहीही ऐकत नसल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

Leave Comments