By Editor on Thursday, 31 August 2023
Category: महाराष्ट्र

[Lokshahi Marathi]राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा

खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची  मुंबईत बैठक होती. बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम सरकारच्या धोरणातून होत आहे. तांदुळाबद्दल मी बोलले, कांद्यावर मी ४ महिन्यापासून बोलत आहे. देशात कांदा उत्पादन जास्त आहे. तर जगात कांदा कमी आहे. त्यामुळे निर्यातीची परवानगी द्या, अशी मागणी मी सरकारला केली होती. मात्र त्यांनी परवानगी दिली नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे.

Leave Comments