देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकल्या होत्या. असे असताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यंत्रीपदापासून वंचित राहावं लागलं होतं. याच मुद्द्यावरुन शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय झालाय असं त्या म्हणाल्या.
भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर अन्याय होत आहे. १०५ आमदार निवडून आणणाऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत माझ्या मनात प्रचंड दु:ख आणि वेदना आहेत.त्यांना मुख्यमंत्री पद द्यायला हवं होतं. उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं, त्यातही ते वाटून देण्यात आलं आहे.पालकमंत्रीपद कोणाला द्यायचं तोही अधिकार त्यांना देण्यात आला नाही, असा टोला त्यांनी लगावला.