"मी गेले दोन दिवस मागणी करतेय, तुमचा सगळा रेकॉर्ड काढून बघा ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि तातडीनं अधिवेशन घ्या, ही सातत्यानं मी मागणी करते आणि माझा स्वतःचा रेकॉर्ड तुम्ही काढून बघा आणि सत्तेतल्या बाकी सगळ्या खासदारांचा रेकॉर्ड काढून बघा, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल महाराष्ट्राच्या वतीनं सगळ्यात जास्त वेळा हा मुद्दा मांडलेली खासदार कोण आहे?", असंही त्या म्हणाल्यात. तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले की, "माननीय देवेंद्रजी आमच्या घराच्याबाहेर येऊन म्हणाले होते, पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ धनगर समाजाला. काय झालं दहा वर्ष झाली गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आहे, ना मराठा समाजाला 30 दिवसात... आज जरांगे पाटलांचा मनाचा मोठेपणा आहे की, ते स्वतः म्हटले 30 दिवस नको, मी दहा दिवस वाढवून देतो, 40 दिवस दिलेत."