अंमलीपदार्थांची वाढती प्रकरणे हाताळण्यात गृहमंत्री फडणवीस अपयशी ठरले आहेत. दहा दिवस आधी गृहमंत्री या सर्व प्रकरणांचा पर्दाफाश करणार होते. तस्करांची नावे राज्याला सांगणार होते. मात्र, त्याचं पुढं काय काय झालं? असं सुळे यांनी म्हटलंय. या सरकारची लाईन अशी आहे, की एव्हडंच बोलायचं अन् निघायचं असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावलाय.