राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी पुकारलेल्या बंडानंतर सर्वात जास्त चर्चा शरद पवार, सुप्रिया सुळे अन् अजित पवार यांची झाली. या बंडानंतर सुप्रिया सुळे यांनी कधी अजित पवार यांच्यावर सरळ टीका केली नाही. परंतु राज्यभरात पक्षाची बांधणी करण्याचे काम त्या करत आहेत. पण इंदापुरात त्यांनी इंदापूर आणि पवार कुटुंबाचे सहा दशकाचे ऋणानुबंध असल्याचे सांगत पंधरा वर्षे प्रेम आणि आशीर्वाद दिले पुढेही ऑन मेरिट मला पास करा असे आवाहन केले.