By Editor on Monday, 27 February 2023
Category: महाराष्ट्र

[TV9 Marathi]फडणवीसांना जबाबदार, सुसंस्कृत व्यक्ती समजत होते

आता त्यांचा भरोसा राहिलेला नाही-खासदार सुप्रिया सुळे 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार सुसंस्कृत व्यक्ती समजत होते. मात्र आता तसं राहिलं नाही, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांनाही टोला लगावला आहे. कसबा निवडणुकीत पैशाचं वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी फडणवीसांनी पैसे वाटणं आमची संस्कृती नसल्याचे स्पष्ट केले होते. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना चिमटा काढत म्हटलं की, आजकाल फडणवीस कधी काय बोलतील याचा भरोसाच राहिला नाही.

Leave Comments