By Editor on Saturday, 23 September 2023
Category: महाराष्ट्र

[ABP MAJHA]राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली हे काश्मिर टू कन्याकुमारी सर्वांना माहित आहे

भाजपाच्या सोबत असाल तर चौकशा, धाडी थांबतात. पण विरोधात बोलाल तर एजन्सीजच्या माध्यमातून त्रास दिला जातो. असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. माझ्या तीन बहिणींच्या घरावर एजन्सीच्या धाडी घालण्यात आल्या. त्यांचा राजकारणाशी दूरपर्यंत संबंध नाही. त्यांच्या घरापर्यंत एजन्सीज् गेल्या. त्यांच्यावर धाडी कशासाठी? हे माझ्या बहिणी आहेत म्हणून बोलत नाही तर अनिल देशमुख असोत, संजय राऊत किंवा नबाबभाई यांच्या घरातील महिलांना भाजपाच्या या राजकारणापायी नाहक त्रास सहन करावा लागला. असेही सुळे म्हणाल्या आहेत. 

Leave Comments