भाजपाची दिल्लीतील अदृश्य शक्ती ही मराठी माणसाला त्रास देत आहे. गडकरी यांची खाती कमी केली, देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून त्यांच ही डिमोशन केल. बाळासाहेबांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हीच मराठी माणसांची खरी ताकद आहे, पण ती ओरबाडून घेतली. भाजपा जातीजातीत भांडणे लावते. म्हणून त्यांना माझा विरोध आहे. मराठा, धनगर, लिंगायत व मुसलमान यांना आरक्षण देतो म्हणतात, नोकरी देताना कंत्राटी दिली मग त्यात आरक्षण मिळणार का? सध्याचे सरकार शाळा बंद करत आहे आणि दारु दुकाने वाढत आहेत. असा घनाघात खा सुप्रीया सुळे यांनी केला.