सुप्रिया सुळे म्हणल्या, धनगर, मुस्लिम आणि लिंगायत समाजाच्या देखील आरक्षणाच्या मागण्या आहेत. मुस्लिम धनगर समजाला जे सरकार न्याय देईल, त्यांच्या सोबत आम्ही ताकदीने उभे राहू. त्यांनी नाही दिला तर आम्ही आमचं सरकार आल्यावर न्याय देऊ,असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. बिहारमधील राजकीय घडामोडींना सध्या बराच वेग आला आहे. त्यातच आता नितीश कुमार हे भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा सध्या बिहारच्या राजकीय वर्तुळात आहे. यंत्रणांचा गैरवापर करुन पक्ष फोडले जातात. सत्ताधारी दडपशाही करीत असून त्यांच्या विरोधात आम्ही लढत राहू, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.