कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्या गृह खात्याचे अपयश असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच शरद पवार यांनी संभाजीनगरवर एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावरील प्रश्नावर सुप्रिया सुळे पत्रकारावर भडकल्या. शरद पवार असं म्हणलेच नाहीत असं सांगत ते तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत. जे लोक अस म्हणत असतील त्यांना लाज वाटली पाहिजे असं देखील त्या म्हणाल्या आहेत.