By Editor on Monday, 29 January 2024
Category: पुणे शहर

[ABP MAJHA]मुस्लिम आणि धनगरांना न्याय द्या, सरकासोबत ताकदीनं उभे राहू- खासदार सुप्रिया सुळे

मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जरांगे यांनी १३ मागण्या केल्या होत्या. जरांगे यांच्या या मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक चर्चाना उधाण आले आहे. मराठा आरक्षणावर प्रत्येक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. सरकार हा अध्यादेश लवकरही काढू शकले असेत, पण त्यासाठी जरांगेंना (Manoj Jarange) मुंबईमध्ये यावे लागले. मग या सरकारने अध्यादेश काढला, त्यामुळे हे सरकार किती असंवेदनशील आहे, हे यावरुन स्पष्ट झाले, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे. मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केल्या होत्या, त्याचा अध्यादेश सरकारने काढला असून तो मनोज जरांगे यांच्या हाती सुपूर्द केला. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे यांचे आभार मानले. 

Leave Comments