कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्या गृह खात्याचे अपयश असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. महिला, स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत. दुसरीकडे हे सरकार बेटी पढाव बेटी बचाव नारा देऊन नागरिकांची दिशाभूल करत आहे. असा टोला देखील त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारला लगावला आहे. त्या आळंदीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. निवडणूक फायद्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी लढते असे देखील सुळे म्हणाल्या आहेत.