By Editor on Sunday, 26 November 2023
Category: इंदापूर

[ABP MAJHA]अनेक भाजप नेत्यांसह आमचे संबंध, आमची लढाई राजकिय,वैयक्तिक नाही

 मराठी लोकांच्या अस्मितेचा फज्जा उडविण्याचे पाप दिल्लीतली अदृश्य शक्ती करत आहे. त्या अदृश्य शक्तीला महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे आहे. महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे नुकसान कसे होईल याचा प्रयत्न सुरू आहे. फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना नाही तर गडकरी आणि फडणवीस यांनाही तसेच वागवले जाते, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय.आमची लढाई ही वैचारिक आहे, वैयक्तिक नाही. सातत्याने मी माझी भूमिका यासंदर्भात स्पष्ट केली आहे. त्यामुळं वैचारिक भूमिकेबाबत कसं कॉम्प्रमाईज करणार, असा खरमरीत सवाल त्यांनी केला.

Leave Comments