न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर सध्या राष्ट्रवादीच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. यावरुन आता दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी याचवरुन हल्लाबोल करत राष्ट्रवादी फुटीला भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीमधील अदृश्य शक्तीने महाराष्ट्र राज्याचा खेळ खंडोबा करून ठेवलाय अशी टीका खा.सुप्रिया सुळेंनी केली आहे.