राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पण जनतेच्या मनात सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर रोष असल्याचे दिसत आहे. सामान्य जनता सुद्धा ईडी सरकारला खोके सरकार म्हणताना दिसत आहे. आज पुन्हा गॅसचे दर वाढले आहेत. निर्यात घटली आहे. आम्ही वारंवार हे संसदेत मांडत होतो. पण सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.