महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या धामधूम सुरु असताना संसदेची विशेष बैठक पार पाडून आपल्या मतदारसंघात सुप्रियाताई सुळे परतल्या आहेत. आपल्या मतदारसंघातील अनेक गणपती मंडळांना त्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या, या प्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, गणरायाचा आगमन झालं तेव्हा पार्लमेंट सुरू होतं, आज मी अनेक गणपतीच्या मंडळांना भेट दिली. गणरायांना साकडे घालत महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळू दे. अशी प्रार्थना देखील केली