1 minute reading time
(82 words)
[ABP MAJHA]हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
मीरा-भाईंदरमध्ये (Marathi Morcha MNS in Mira bhayandar) उद्भवलेल्या परिस्थितीला सर्वस्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जबाबदार आहेत. सरन्यायाधीश भूषण गवई आज महाराष्ट्रात आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अशावेळी गृहखातं काय करतं? त्यामुळे याला जबाबदार मुख्यमंत्री आणि गृहखातं आहेत. असा आरोप राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेप्रमाणेएका शशक्त लोकशाहीत प्रत्येक भारतीयाला आंदोलन करायचा अधिकार दिला आहे. ही लोकशाही आहे दडपशाही नाही. असेही त्या म्हणाल्या.

