1 minute reading time
(73 words)
[TV9 Marathi]बोपदेव घाटात गँगरेप प्रकरणातील मुलीला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही-सुळे
पुण्यातील व राज्यातील कायदा सुव्यवस्था पुर्णपणे निकामी झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे, मात्र मंत्रालयात तडजोडी होत असल्याने वर्दीची भिती राहीलेली नाही. महाराष्ट्राचा क्राईम रेट का वाढतोय, याचे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावेच लागेल?' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी राज्याच्या गृहविभागावर टीका केली..पुण्यासह राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या आंदोलनात खासदार सुळे सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

