1 minute reading time
(74 words)
[TV9 Marathi]'हिंदीच्या विरोधात आपण आलो, त्यांना कळल म्हणून त्यांनी माघार घेतली'
महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदी भाषेसंबंधी जीआर रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 5 जुलैला भव्य मोर्चा काढला जाणार होता मात्र पावसाळी अधिवेशनच्या पुर्वसंध्येला हा निर्णय रद्द केला गेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी ही ट्विट करत महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन केले आहे. तसेच जनसुरक्षा विधेयाकाविरोधातील आंदोलनात देखील त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.