1 minute reading time
(68 words)
[Saam TV]वर्धापन दिनानिमित्त सुप्रिया सुळेंचं दणदणीत भाषण!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर पहिल्यांदाच दोन्ही गटाच्या वर्धापनदिनाचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी पार पडले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २५ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम अहमदनगर (अहिल्यादेवी नगर) शहरात सोमवारी (ता.१०) पार पडला. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसद बंद पाडू असे म्हटले आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी कांदा प्रश्नावरून भाजपला छेडले आहे. सध्या सुळे यांच्यासह लंके यांच्या वक्तव्यांची जोरदार चर्चा होत आहे.

