1 minute reading time
(94 words)
[ABP MAJHA]Supriya Sule PC LIVE | Ladki Bahin Yojna | NCP | Baramati
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट विमानाने मुंबईहून दिल्लीकडे प्रवास करत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे मुंबई विमानतळावर काही काळ अस्वस्थता निर्माण झाली. सुनेत्रा पवारांच्या सोबत पार्थ पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील होते. विमान व्हीएसआर कंपनीचे होते, अशी चर्चा आहे. विमानातील बिघाडामुळे प्रवास दोन तास लांबला. तांत्रिक दुरुस्तीनंतर विमान संध्याकाळी ७ वाजता दिल्लीकडे निघाले. या घटनेमुळे लोकांच्या मनात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले, कारण सहा महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात दुर्दैवाने मृत्यू झाला होता.

