2 minutes reading time (342 words)

[Saam TV]राज्यातील हवा आता बदललेय

राज्यातील हवा आता बदललेय

हर्षवर्धन पाटील यांच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

 "इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर आज कार्यकर्तांच्या मेळाव्यात भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केले. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, राज्यात आता हवा बदलली आहे हे सरकार जाणार असल्याचा दावा केला आहे. २ जुलै पासून पवार साहेबांवर विश्वास ठेवून जो पक्षात राहिला त्याचा मान सन्मान नक्की होईल त्याची जबाबदारी माझी असेल पक्षात कोणावर अन्याय होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पाटील आणि पवार कुटुंबचं नात जुण आहे. आता पुन्हा आम्हाला एकत्र काम करायची संधी मिळत आहे. आता राज्यात हवा बडलली आहे, हे सरकार जाणार आहे २ जुलै पासुन पवार साहेबांवर विश्वास ठेवून जो पक्षात राहिला त्याचा मान सन्मान नक्की होईल त्याची जबाबदारी माझी असेल पक्षात कोणावर अन्याय होणार नाही, नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे..

नरहरी झिरवाळ आणि आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून उड्या मारल्या, हा गंभीर प्रकार आहे. सत्तेत असणाऱ्या आमदारांना असं वाटणं याचा अर्थ हे सरकार जाण्याची वेळ आलेली आहे. मी सत्तेत असते तर राजीनामा दिला असता. अशा प्रकारच्या घटना म्हणजे सरकारच अपयश आहे. या सरकारला केवळ राजकारण करायचं आहे. आजचा दिवस राज्यासाठी काळा दिवस असल्याचं त्यांनी म्हटलं आहे..

हर्षवर्धन पाटील केलं होतं कार्यकर्त्यांना आवाहनहर्षवर्धन पाटील यांना ⁠आज आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की नाही घ्यायचा ? असे म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांकडून हो म्हणत घोषणा देण्यात आल्या. मला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलं होतं. सिल्वर ओपन बैठक झाली. शरद पवार यांनी सांगितलं की तुम्ही निर्णय घ्या, बाकीची जबाबदारी माझी राहील, असं म्हणत त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

...

Supriya Sule : राज्यातील हवा आता बदललेय ; हर्षवर्धन पाटील यांच्या घोषणेनंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया | The Atmosphere in the State Has Changed Now; Supriya Sule's Reaction After Harshvardhan Patil's Announcement|Saam Tv

Supriya Sule : इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर आज कार्यकर्तांच्या मेळाव्यात भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केले. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, राज्यात आता हवा बदलली आहे हे सरकार जाणार असल्याचा दावा केला आहे.
[Pudhari]हातात बंदूक घेऊन पोस्टरबाजी करायची तर गृह...
[My Mahanagar]कारमध्ये बसवलं आणि..., बोपदेव घाटत र...