1 minute reading time
(72 words)
[Zee 24 Taas]'राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली, गुन्हेगारीत वाढ'
सुळेंचा सरकारवर जोरदार निशाणा
खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागले. सध्या जुमल्यांचा पाऊस पडतोय. मागील सव्वावर्षापासून राज्याच्या गृह विभागाचा कारभार बिघडला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पुण्यातील पोर्षे कार अपघात प्रकरणात बरेच घोळ झाल्याचे आपण बघितलं. बीडमधील तणावग्रस्त परिस्थिती हे गृह विभागाचे अपयश असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

